शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

पीक पाहणी ॲपमध्ये अनेक अडथळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पेरा आपणच भरावा हा शासनाचा चांगला उद्देश असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲंड्राईट मोबाईल उपलब्ध नाही ज्या ...

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पेरा आपणच भरावा हा शासनाचा चांगला उद्देश असला तरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲंड्राईट मोबाईल उपलब्ध नाही ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही अशा शेतकऱ्यांसाठी फारच अडचणीचे झाले आहे. पिकाची नोंद करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर दिली आहे. जे शेतकरी पीक पाहणी ॲपमध्ये पिकाची नोंद करणार नाही. त्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहील. परिणामी त्या शेतकऱ्यांना कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही. सध्याचा काळ हा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने फारच अडचणीचा आहे. खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांजवळील होता नव्हता पैसा खर्च झाला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांजवळ पैसे नाही. ॲंड्राईट मोबाईल फोन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा उरला नाही. त्यामुळे मोबाईल खरेदी कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही शेतकऱ्याची वास्तवता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध आहेत. ते शेतकरी पिकाची नोंदणी करताना दिसून येत आहेत. परंतु पिकाची नोंदणी करताना कधी कधी हे ॲप ओपन होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी सहायक, तलाठी शेतकऱ्यांच्या मदतीला असले तरीही मोबाईल ॲप चालविण्यासाठी नेटवर्क मिळत नसेल तर काय उपयोग? यामुळे पीक पाहणी योजना कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांसाठी हा ॲप त्रास देणारा ठरला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.