शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बालमृत्यूसाठी कुपोषण कारणीभूत

By admin | Updated: July 5, 2017 00:38 IST

कुपोषण निर्मूलनासाठी केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च होतो. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

गंगाधर परशुरामकर यांची माहिती : तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये वृद्धीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कुपोषण निर्मूलनासाठी केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च होतो. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अर्जुनी-मोरगाव उपविभागात २५० च्यावर तीव्र कमी वजनाची बालके आढळून आलीत. यावर वेळीच उपाययोजना करा, असे पत्र जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.गर्भावस्थेत गरोदर मातांची विशेष काळजी घेवून कमी वजनाची बालके जन्माला येवू नयेत, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्यांच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्याअंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा मातांची विशेष काळजी घेतली जाते. यावर पगारापोटी शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च होतो. त्यांना उच्च प्रतीचा आहार पुरवठा होतो. मात्र अद्यापही मातामृत्यू व बालमृत्यू दर शून्यावर तसेच कुपोषणावर नियंत्रण आणता आले नाही, हे दुर्दैव.अर्जुनी-मोरगाव उपविभागात येणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्यात मार्च महिन्यात आठ हजार २२६ बालकांचे वजन घेण्यात आले. यात कमी वजनाची ४८८ तर तीव्र कमी वजनाची ९२ बालके आढळून आली. यात सुधारणा होण्याऐवजी उलट एप्रिल महिन्यात आठ हजार २१० बालकांपैकी कमी वजनाची ४७८ तर तीव्र कमी वजनाची १०१ बालके आढळून आलीत. यावरून तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये वृद्धी होत असल्याचे निदर्शनास येते. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात तर यापेक्षाही भयावह चित्र आहे. ० ते ५ वयोगटातील १० हजार २०२ बालकांचे वजन घेण्यात आले. यापैकी कमी वजनाचे ८६९ तर तीव्र कमी वजनाचे १६२ बालके आढळून आली. फेब्रुवारी महिन्याचा जन्मदर १०.८४ टक्के असला तरी बालमृत्यू दर मात्र ११.०९ टक्के आहे. निश्चितच ही चिंतेची बाब आहे. यासारखीच इतर तालुक्यातही परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकही माता मृत्यू नाही, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मात्र बालमृत्यू व कुपोषण रोखण्यात प्रशासनाला अद्यापही यश आले नाही, ही तेवढीच चिंतेची बाब आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतीत उपाययोजना करणे गरजेचे आहे.