शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

बालमृत्यूसाठी कुपोषण कारणीभूत

By admin | Updated: July 5, 2017 00:38 IST

कुपोषण निर्मूलनासाठी केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च होतो. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

गंगाधर परशुरामकर यांची माहिती : तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये वृद्धीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कुपोषण निर्मूलनासाठी केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च होतो. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अर्जुनी-मोरगाव उपविभागात २५० च्यावर तीव्र कमी वजनाची बालके आढळून आलीत. यावर वेळीच उपाययोजना करा, असे पत्र जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.गर्भावस्थेत गरोदर मातांची विशेष काळजी घेवून कमी वजनाची बालके जन्माला येवू नयेत, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्यांच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्याअंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा मातांची विशेष काळजी घेतली जाते. यावर पगारापोटी शासनाचा कोट्यवधी रूपयांचा खर्च होतो. त्यांना उच्च प्रतीचा आहार पुरवठा होतो. मात्र अद्यापही मातामृत्यू व बालमृत्यू दर शून्यावर तसेच कुपोषणावर नियंत्रण आणता आले नाही, हे दुर्दैव.अर्जुनी-मोरगाव उपविभागात येणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्यात मार्च महिन्यात आठ हजार २२६ बालकांचे वजन घेण्यात आले. यात कमी वजनाची ४८८ तर तीव्र कमी वजनाची ९२ बालके आढळून आली. यात सुधारणा होण्याऐवजी उलट एप्रिल महिन्यात आठ हजार २१० बालकांपैकी कमी वजनाची ४७८ तर तीव्र कमी वजनाची १०१ बालके आढळून आलीत. यावरून तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये वृद्धी होत असल्याचे निदर्शनास येते. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात तर यापेक्षाही भयावह चित्र आहे. ० ते ५ वयोगटातील १० हजार २०२ बालकांचे वजन घेण्यात आले. यापैकी कमी वजनाचे ८६९ तर तीव्र कमी वजनाचे १६२ बालके आढळून आली. फेब्रुवारी महिन्याचा जन्मदर १०.८४ टक्के असला तरी बालमृत्यू दर मात्र ११.०९ टक्के आहे. निश्चितच ही चिंतेची बाब आहे. यासारखीच इतर तालुक्यातही परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकही माता मृत्यू नाही, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मात्र बालमृत्यू व कुपोषण रोखण्यात प्रशासनाला अद्यापही यश आले नाही, ही तेवढीच चिंतेची बाब आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतीत उपाययोजना करणे गरजेचे आहे.