शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दवनीवाडा तालुका बनवा

By admin | Updated: January 9, 2016 02:18 IST

मागील अनेक वर्षांपासून दवनीवाड्याला तालुका बनविण्याची मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा मुद्दासुद्धा दुर्लक्षिल्या जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येत आहे.

पंचायत समिती तयार करा : तालुका व पंचायत समिती निर्माण कार्य समितीची मागणीगोंदिया : मागील अनेक वर्षांपासून दवनीवाड्याला तालुका बनविण्याची मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा मुद्दासुद्धा दुर्लक्षिल्या जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येत आहे. तालुका बनू शकेल येथपर्यंतची मजल दवनीवाड्याने गाठिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी आजही दवनीवाडा तालुका बनण्याची प्रतीक्षा आहे.ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी विचार करून परिसरात शांतता नांदावी व सर्वांगिन विकास व्हावा, या हेतूने ९६ गावांच्या मध्यभागी असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा येथे पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. सर्व सोयी-सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सदर गाव व परिसराची उपेक्षा करण्यात येवू लागली. उपेक्षित दवनीवाडा परिसराचा विकास व्हावा, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक प्रगती होवून शासकीय कामकाज अत्यल्प वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सर्व राजकीय पक्षांचे आमदार, खासदार व अनेक नामदार यांनी दवनीवाड्याच्या नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडेही ही मागणी पूर्ण करणे किती गरजेचे आहे, हे समजावून देण्यासाठी मुंबई व नागपूर विधानसभेच्या बैठकीत शिष्टमंडळाचे नेतृत्व करून सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणूण दिली. मात्र नवीन तालुके व पंचायत समिती महाराष्ट्रात निर्माण करताना प्रत्येक वेळी ‘तुमची मागणी अवश्य पूर्ण करू’ असेच आश्वासन मिळत गेले. यानंतर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात लाखणी व अर्जुनी नवीन तालुके निर्माण करण्यात आले. परंतु दवनीवाडा तालुका बनविण्याची मागणी अद्यापही थंडबस्त्यात आहे. महाराष्ट्र शासनाने अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याबाबत माहिती मागितली आहे. दवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण करण्यासाठी आवश्यक माहिती व तपशीलही शासनाला सादर करण्यात आले आहे. मात्र या मागणीची सतत उपेक्षाच करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे. (प्रतिनिधी)परिसीमन आयोगाची बंदीदवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण कार्य समितीच्या मागणीला शासनाने सन २००६ मध्ये परिसीमन आयोगाने बंदी घातल्याने दवनीवाडा मुख्यालय ठेवून नवीन तालुका निर्माण करण्याच्या मागणीला शासनाकडून मान्य करता येत नसल्याचे पत्र महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबईने पाठवून कळविले होते. त्यात १ आॅगस्ट २००२ पासून लोकसभा, विधानसभा मतदार संघांच्या परिसीमनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय घटकांची पुनर्रचना करून नवीन प्रशासकीय घटक निर्माण करण्यावर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या परिसीमन आयोगाने बंदी घातलेली आहे, असे नमूद होते. गोंदिया पंचायत समितीचे उपकार्यालयगोंदिया पंचायत समिती ही गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. या पंचायत समितीचे कार्यक्षेत्र भौगोलिकदृष््या मोठे आहे. शेतकरी व इतर व्यक्तींना प्रत्येकवेळी पंचायत समितीमध्ये यावे लागते. त्यामुळे अधिक वेळ व पैसा खर्च होतो. ही बाबसन २००५ मध्येच तत्कालीन पं.स. चे उपसभापती रहमतकर यांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच पंचायत समिती गोंदियाचे उपकार्यालय दवनीवाडा येथे सुरू करण्याबाबत सूचविले होते. सर्वानूमते तसे ठरवून आवश्यक कर्मचारीवर्ग पुरविण्याची मागणीसुद्धा जि.प. गोंदियाला करण्यात आली होती. मात्र माशी कुठे शिंकली कोण जाणे?