शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

पथदिव्यांचा वीजपुरवठा नियमित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

केशोरी : विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायत हद्दीच्या गावातील पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायतीने त्वरित करावा म्हणून नोटीस बजावून ...

केशोरी : विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायत हद्दीच्या गावातील पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायतीने त्वरित करावा म्हणून नोटीस बजावून केशोरी येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा मागील आठ दिवसांपासून खंडित केला आहे. त्यामुळे पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात यावा यासाठी सरपंच संघटनेने पुढाकार घेतला आहे.

स्थानिक ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कोरोनाच्या महामारीने खालावली असून जिल्हा परिषदेने पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत सापडले आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या रकमेतून पथदिव्यांच्या थकीत बिलाचा भरणा करावा अशा जिल्हा परिषदेने सूचना देऊन आपले हात झटकले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी येथील सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेच्या वतीने पालकमंत्री नवाब मलिक यांना निवेदन दिले. गावातील थकीत पथदिव्यांचे विद्युत बिल जिल्हा परिषदेने भरण्याची मागणी केली आहे. मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या महामारीने अर्जुनी मोरगाव तालुक्यासह केशोरी या गावच्या ग्रामपंचायतीची करवसुली बंद आहे. या ग्रामपंचायतीला इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा कसा करावा, अशा बिकट स्थितीत ग्रामपंचायत सापडली आहे. महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्यांचा विद्युत बिलाचा भरणा करावा, असे वेळोवेळी आदेश काढून ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देत आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीला फक्त गावातील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल या निधीतून भरावे लागते. त्याचबरोबर पथदिव्यांची केवळ दुरुस्ती व देखभाल या बाबीवर १५ व्या वित्त आयोगाची रक्कम खर्च करता येते. याची शासनाला व जिल्हा परिषदेला जाणीव असतानासुद्धा पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा करण्यासंदर्भात शासन व जिल्हा परिषद तगादा लावत असल्यामुळे ही व्यथा पालकमंत्री नवाब मलिक यांना अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे.

............

...तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

१५ व्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी पथदिव्यांच्या थकीत बिलापेक्षा कमी असल्याने थकीत बिलाची रक्कम भरणे कठीण आहे. त्यातच पाणीपुरवठा योजनेची बिले भरून गाव विकासाची कामे करावी लागतात. विद्युत बिलामुळे गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महावितरण विद्युत कंपनीने पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाची रक्कम मागणीचा तगादा न लावता पथदिव्यांचा विद्युत पुरवठा नियमित ठेवावा या मागणीसह सरपंच नंदू पाटील गहाणे, उपसरपंच रामू बनकर यांनी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

.................

‘‘महाराष्ट्र शासन वेळोवेळी अध्यादेश जारी करून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात पथदिव्यांचे थकीत विद्युत देयक ग्रामपंचायतने भरावे, असे तुघलकी फर्मान काढून ग्रामपंचायतीवर अन्याय करीत आहे.

- नंदू पाटील गहाणे, सरपंच केशोरी