शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Election 2019 ; गोंदियात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असाच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

पक्षाकडून उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना डावलले गेल्याने गोंदिया,आमगाव, तिरोडा या मतदारसंघात पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. तर मागील पंधरा वर्षांपासून विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल हे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत आहेत.

ठळक मुद्देशहरी भागातील मते ठरणार निर्णायक : बंडखोरीमुळे मतांचे विभाजन, प्रामाणिकतेची लागणार कसोटी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून प्रचारात शेवटच्या दोन दिवसात कोण बाजी मारतो हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाच प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरा सामना हा भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल आणि भाजपमधून बंडखोरी करुन अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विनोद अग्रवाल यांच्यातच आहे. त्यामुळे अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असाच सामना रंगणार आहे. प्रचारात सध्या या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली असली तरी शहरी भागातील मते ‘गोंदियाचा आमदार कोण’ हे ठरविणार आहेत.पक्षाकडून उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना डावलले गेल्याने गोंदिया,आमगाव, तिरोडा या मतदारसंघात पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. तर मागील पंधरा वर्षांपासून विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल हे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली.त्यामुळे ते या मतदारसंघातून चौथ्यांदा नशीब आजमावित आहेत. त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड सुध्दा आहे. तर मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघातून तयारी करीत असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांना ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. दहा वर्षांपासून या मतदारसंघात त्यांचा सुध्दा चांगला जनसंपर्क असून भाजपमधील काही असंतुष्टांची मते त्यांच्या पथ्यावर पडण्याची चर्चा आहे. तर काँग्रेसने अमर वºहाडे यांना उमेदवारी दिली असून ते दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत नवखे आहेत.वंचित बहुजन आघाडीने जनार्धन बनकर आणि बसपाने धुरवास भोयर यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून एकूण १८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही गोपालदास अग्रवाल विरुध्द विनोद अग्रवाल अशीच होणार आहे.या मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख २१ हजार ७७८ मतदारांचा समावेश आहे.मतदारसंघातील सध्याचे वातावरण पाहता ग्रामीण भागावर गोपालदास अग्रवाल यांनी चांगली पकड मजबूत केली आहे.मात्र शहरीभाग हा भाजपबहुल मानला जातो. तर विनोद अग्रवाल हे सुध्दा मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते. आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. तर गोपालदास अग्रवाल हे भाजप-सेना युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने शहरी भागातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते किती पक्ष निष्ठा आणि प्रामाणिकतेने काम करतात यावरच विजयाचे अंतिम समीकरण ठरणार आहे. तर हा मतदारसंघ काँग्रेसचा गड असला तरी नवखा उमेदवार दिल्याने हा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.एकंदरीत दोन्ही अग्रवालांनी प्रचारात जी आघाडी घेतली आहे ती २१ आॅक्टोबरपर्यंत कायम राहिल्यास सामना चांगलाच रंगतदार होण्याची शक्यता आहे.कुणीही निवडून आले तरी इतिहासगोंदिया विधानसभा मतदारसंघ अस्तीत्त्वात आल्यापासून सलग चारवेळा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. तर अपक्ष उमेदवार सुध्दा या मतदारसंघातून निवडून आलेला नाही. त्यामुळे गोपालदास अग्रवाल ंिकंवा विनोद अग्रवाल निवडून आले तरी तो या मतदारसंघाचा इतिहासाच होणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल