शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोची मत्स्यबीज तळी ठरतात वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:25 IST

गावात तलाव तर आहे. पण त्या तलावाच्या पाण्याचा सिंचनासोबत मासेमारांना उदरनिर्वाहाचे साधन व्हावे,

मोरगाव ग्रामपंचायतचा पुढाकार : मासेमारांना रोजगार मिळण्याची आशा संतोष बुकावन। लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : गावात तलाव तर आहे. पण त्या तलावाच्या पाण्याचा सिंचनासोबत मासेमारांना उदरनिर्वाहाचे साधन व्हावे, यासाठी मोरगावच्या ग्रामपंचायतने पुढाकार घेतला व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात पहिली मत्स्यबीय तळी तयार केली. यामुळे स्थानिक मासेमारांना बारमाही रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीला सिंचनाचचे पाणी उपलब्ध करुन देणारा मामा तलाव मोरगाव येथे आहे. येथे ढिवर समाजाची सुमारे ६० कुटूंब आहेत. याच गावात केवळराम मत्स्यमार संस्था आहे. मात्र समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना बारमाही रोजगार नाही. हक्काची शेती नाही. या समाजाच्या आस्थापनासाठी कायमस्वरुपी बारमाही रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, सरपंच भूमिता लोधी, उपसरपंच राजू पालीवाल यांनी पुढाकार घेतला. मग्रारोहयो योजनेतून मत्स्यबीज निर्मितीसाठी तळी तयार करता येईल, का याचा खंडविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांच्याशी चर्चा करुन पाठपुरावा केला. तब्बल सहा महिन्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले. अवघ्या १ लक्ष ४८ हजार ३१४ रुपयात ही मत्स्यबीज तळी तयार झाली. मनरेगा अंतर्गत १९ बाय १९ मीटर आकाराची तळी तयार झाली. ही सध्या ग्रा.पं.च्या अखत्यारित येते. या तळ्याची खोली ३ मिटर आहे. मोटरपंपद्वारे तलावातील पाणी या तलावात साठवले जाते. सध्या याठिकाणी मत्स्यजीरे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जातीन मत्स्यअंडी घालून तिथे उगवायची. चार दिवसानंतर ते छोट्या टाकीत घालून त्याचे संवर्धन करायचे व बोटूकली झाल्यानंतर मोठ्या टाकीत व त्यानंतर तलावात सोडायचे. १ वर्षात सुमारे १ ते सव्वा किलोची मासोळी तयार होणार आहे. सध्या तलावात कतला जातीच्या मासोळीने ५६ कप्पे अंडी उगवण्यासाठी तलावात तयार करण्यात आले आहेत. एका कप्प्यात उत्तम यश आल्यास सुमारे १ लाख मत्स्य जिरे तयार होत असल्याचे मोतीराम मेश्राम यांनी सांगितले. हे मत्स्य जिरे कुणालाही विक्री न करता आम्हीच तलावात मासोळी तयार करणार असल्याचे ते म्हणाले. मोरगाव येथील मत्स्यसंस्था यापुर्वी मत्स्य जिरे विकून घेऊन तलावात घालायाची. यातून पोटभरण्याऐवढेही उत्पन्न येत नसे. आता मात्र स्वत: उत्पादन करायला सुरुवात केल्याने चांगला नफा होण्याचा विश्वास आहे.संस्थेचे अध्यक्ष कैलास चाचेरे, ग्रा.पं.सदस्य दयाराम सोनवाने, मधू दिघोरे, विठ्ठल सोनवाने, मोतीराम मेश्राम, रोजगार सेवक परसराम लाडे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.