शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

मग्रारोहयोची मत्स्यबीज तळी ठरतात वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:25 IST

गावात तलाव तर आहे. पण त्या तलावाच्या पाण्याचा सिंचनासोबत मासेमारांना उदरनिर्वाहाचे साधन व्हावे,

मोरगाव ग्रामपंचायतचा पुढाकार : मासेमारांना रोजगार मिळण्याची आशा संतोष बुकावन। लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : गावात तलाव तर आहे. पण त्या तलावाच्या पाण्याचा सिंचनासोबत मासेमारांना उदरनिर्वाहाचे साधन व्हावे, यासाठी मोरगावच्या ग्रामपंचायतने पुढाकार घेतला व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात पहिली मत्स्यबीय तळी तयार केली. यामुळे स्थानिक मासेमारांना बारमाही रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीला सिंचनाचचे पाणी उपलब्ध करुन देणारा मामा तलाव मोरगाव येथे आहे. येथे ढिवर समाजाची सुमारे ६० कुटूंब आहेत. याच गावात केवळराम मत्स्यमार संस्था आहे. मात्र समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना बारमाही रोजगार नाही. हक्काची शेती नाही. या समाजाच्या आस्थापनासाठी कायमस्वरुपी बारमाही रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, सरपंच भूमिता लोधी, उपसरपंच राजू पालीवाल यांनी पुढाकार घेतला. मग्रारोहयो योजनेतून मत्स्यबीज निर्मितीसाठी तळी तयार करता येईल, का याचा खंडविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांच्याशी चर्चा करुन पाठपुरावा केला. तब्बल सहा महिन्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले. अवघ्या १ लक्ष ४८ हजार ३१४ रुपयात ही मत्स्यबीज तळी तयार झाली. मनरेगा अंतर्गत १९ बाय १९ मीटर आकाराची तळी तयार झाली. ही सध्या ग्रा.पं.च्या अखत्यारित येते. या तळ्याची खोली ३ मिटर आहे. मोटरपंपद्वारे तलावातील पाणी या तलावात साठवले जाते. सध्या याठिकाणी मत्स्यजीरे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जातीन मत्स्यअंडी घालून तिथे उगवायची. चार दिवसानंतर ते छोट्या टाकीत घालून त्याचे संवर्धन करायचे व बोटूकली झाल्यानंतर मोठ्या टाकीत व त्यानंतर तलावात सोडायचे. १ वर्षात सुमारे १ ते सव्वा किलोची मासोळी तयार होणार आहे. सध्या तलावात कतला जातीच्या मासोळीने ५६ कप्पे अंडी उगवण्यासाठी तलावात तयार करण्यात आले आहेत. एका कप्प्यात उत्तम यश आल्यास सुमारे १ लाख मत्स्य जिरे तयार होत असल्याचे मोतीराम मेश्राम यांनी सांगितले. हे मत्स्य जिरे कुणालाही विक्री न करता आम्हीच तलावात मासोळी तयार करणार असल्याचे ते म्हणाले. मोरगाव येथील मत्स्यसंस्था यापुर्वी मत्स्य जिरे विकून घेऊन तलावात घालायाची. यातून पोटभरण्याऐवढेही उत्पन्न येत नसे. आता मात्र स्वत: उत्पादन करायला सुरुवात केल्याने चांगला नफा होण्याचा विश्वास आहे.संस्थेचे अध्यक्ष कैलास चाचेरे, ग्रा.पं.सदस्य दयाराम सोनवाने, मधू दिघोरे, विठ्ठल सोनवाने, मोतीराम मेश्राम, रोजगार सेवक परसराम लाडे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.