शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

मग्रारोहयोची मत्स्यबीज तळी ठरतात वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:25 IST

गावात तलाव तर आहे. पण त्या तलावाच्या पाण्याचा सिंचनासोबत मासेमारांना उदरनिर्वाहाचे साधन व्हावे,

मोरगाव ग्रामपंचायतचा पुढाकार : मासेमारांना रोजगार मिळण्याची आशा संतोष बुकावन। लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : गावात तलाव तर आहे. पण त्या तलावाच्या पाण्याचा सिंचनासोबत मासेमारांना उदरनिर्वाहाचे साधन व्हावे, यासाठी मोरगावच्या ग्रामपंचायतने पुढाकार घेतला व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात पहिली मत्स्यबीय तळी तयार केली. यामुळे स्थानिक मासेमारांना बारमाही रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित १०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीला सिंचनाचचे पाणी उपलब्ध करुन देणारा मामा तलाव मोरगाव येथे आहे. येथे ढिवर समाजाची सुमारे ६० कुटूंब आहेत. याच गावात केवळराम मत्स्यमार संस्था आहे. मात्र समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना बारमाही रोजगार नाही. हक्काची शेती नाही. या समाजाच्या आस्थापनासाठी कायमस्वरुपी बारमाही रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, सरपंच भूमिता लोधी, उपसरपंच राजू पालीवाल यांनी पुढाकार घेतला. मग्रारोहयो योजनेतून मत्स्यबीज निर्मितीसाठी तळी तयार करता येईल, का याचा खंडविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांच्याशी चर्चा करुन पाठपुरावा केला. तब्बल सहा महिन्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले. अवघ्या १ लक्ष ४८ हजार ३१४ रुपयात ही मत्स्यबीज तळी तयार झाली. मनरेगा अंतर्गत १९ बाय १९ मीटर आकाराची तळी तयार झाली. ही सध्या ग्रा.पं.च्या अखत्यारित येते. या तळ्याची खोली ३ मिटर आहे. मोटरपंपद्वारे तलावातील पाणी या तलावात साठवले जाते. सध्या याठिकाणी मत्स्यजीरे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जातीन मत्स्यअंडी घालून तिथे उगवायची. चार दिवसानंतर ते छोट्या टाकीत घालून त्याचे संवर्धन करायचे व बोटूकली झाल्यानंतर मोठ्या टाकीत व त्यानंतर तलावात सोडायचे. १ वर्षात सुमारे १ ते सव्वा किलोची मासोळी तयार होणार आहे. सध्या तलावात कतला जातीच्या मासोळीने ५६ कप्पे अंडी उगवण्यासाठी तलावात तयार करण्यात आले आहेत. एका कप्प्यात उत्तम यश आल्यास सुमारे १ लाख मत्स्य जिरे तयार होत असल्याचे मोतीराम मेश्राम यांनी सांगितले. हे मत्स्य जिरे कुणालाही विक्री न करता आम्हीच तलावात मासोळी तयार करणार असल्याचे ते म्हणाले. मोरगाव येथील मत्स्यसंस्था यापुर्वी मत्स्य जिरे विकून घेऊन तलावात घालायाची. यातून पोटभरण्याऐवढेही उत्पन्न येत नसे. आता मात्र स्वत: उत्पादन करायला सुरुवात केल्याने चांगला नफा होण्याचा विश्वास आहे.संस्थेचे अध्यक्ष कैलास चाचेरे, ग्रा.पं.सदस्य दयाराम सोनवाने, मधू दिघोरे, विठ्ठल सोनवाने, मोतीराम मेश्राम, रोजगार सेवक परसराम लाडे यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.