शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

जंगलातील रानमेव्याची चव हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी मनमोहक असे निसर्गरम्य वातावरण आहे. परिसरातील ...

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी मनमोहक असे निसर्गरम्य वातावरण आहे. परिसरातील जंगलात बहुपयोगी वनसंपत्तीसह टेंभरे, चारबिया, कवठ अशी विविध प्रकारची रानमेवा देणारी झाडे होती, परंतु वृक्षकटाईमुळे ही झाडेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलातील गोड फळे देणारी झाडेच नष्ट केल्याने रानमेव्याची चव हल्लीच्या काळात चाखायला मिळत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गरीब लोक जंगलात जाऊन फळे आणत असत आणि शहरात नेऊन विकत असत. काही लोक गावातील शाळेच्या गेटजवळ बसून टेंभरे चारबिया विकत असत. त्यामुळे त्यांना थोडाफार रोजगार मिळून जात होता. जंगलातील औषधीयुक्त गुणधर्म असलेल्या टेंभरे, चारबिया यासारखी फळांच्या झाडांची प्रजाती नष्ट करून टाकल्या आहेत. त्यामुळे आता या रानमेवा फळांकडे दुर्लक्ष झाले असावे;मात्र हे निश्चित निसर्गाने दिलेल्या रानमेव्याची चव नाहीशी करण्यासाठी मानव जातच जबाबदार असून त्यामुळेच हल्लीच्या पिढीला रानमेव्यांची चव चाखायला मिळत नाही.