शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीच्या निधीला जि.प.चा खो

By admin | Updated: June 24, 2016 00:10 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी ८ कोटी १३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

समाजकल्याण विभागाची आडकाठी : ८.१३ कोटी मंजूर, तीन महिन्यांत खर्च शून्यगोंदिया : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी ८ कोटी १३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात यातील एकही काम मार्गी लागले नाही. त्यामुळे ही अडवणूक कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय यामुळे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या परिपत्रकालाही बगल दिली जात असल्याचे दिसून येते.दलित वस्त्यांच्या कामासाठी ५ डिसेंबर २०११ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुधारित परिपत्रक काढले. त्यात लोकसंख्येच्या निकषानुसार एका दलित वस्तीत जास्तीत जास्त २० लक्ष रुपये खर्च करण्यास मान्यता दिली. परंतू त्या परिपत्रकाला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून केराची टोपली दाखविली जात आहे. या विभागाने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीच केली नसल्याचे दिसून येते.या विभागाने ३१ मार्च २०१६ रोजी शासन निर्णयाप्रमाणे दलित वस्त्यांना १ कोटी २५ लाख रुपये वाटप केले. मात्र दलित वस्त्यांमधील मुलभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मोठा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झालेला असताना तो खर्च करण्यात आखडता होत घेतला जात आहे.यासंदर्भात समाजकल्याण विभागाकडून माहिती घेतली असता मार्च २०१६ अखेर ८ कोटी १३ लाख रुपये निधीला मंजुरी प्राप्त करून घेतल्याची माहिती प्र. समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी दिली. या निधीच्या खर्चाचे नियोजनही तयार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तीन महिने लोटले तरी हा निधी प्रत्यक्ष खर्च करण्यासाठी पंचायत समित्यांकडे पाठवून उपयोगी लावला जात नाही.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच जिल्ह्यात दलित वस्त्यांच्या कामात जिल्हा परिषदेकडून आखडता हात घेतला जात असल्यामुळे या विषयात पालकमंत्र्यांंनी लक्ष घालावे अशीही मागणी होत आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका जनहित याचिकेवरील निर्णयाला अनुसरून जारी केलेल्या परिपत्रकानुसार कामे निवडीचे अधिकार असलेली अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अधिनस्त सहा व्यक्तींची समिती रद्द करण्यात आली आहे. आता हे अधिकार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीला देण्यात आले आहेत. मात्र परिपत्रकातील परिशिष्ट आठ प्रमाणे कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आतातरी जबाबदारी पदाधिकारी व समाजकल्याण अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेऊन दलितांच्या मुलभूत सुविधांसाठी निधीचे वाटप करावे, अशी मागणी सावरीचे माजी सरपंच राधेश्याम गजभिये यांनी केली आहे. (प्रतिनिधी)