शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

महावितरणकडून लूट : शेतकऱ्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

अर्जुनी मोरगाव : विद्युत मीटर बंद असतानाही नवीन मीटर न बसवता मनमर्जी बिल आकारून महावितरण कंपनीने लुबाडणूक केल्याचा आरोप ...

अर्जुनी मोरगाव : विद्युत मीटर बंद असतानाही नवीन मीटर न बसवता मनमर्जी बिल आकारून महावितरण कंपनीने लुबाडणूक केल्याचा आरोप ताडगाव येथील शेतकरी विनायक केवळराम नाकाडे यांनी केला आहे.

तक्रारकर्ते नाकाडे यांची अर्जुनी मोरगाव शिवारात शेती आहे. ते धान पीक घेतात. त्यांच्याकडे पावणेतीन एकर शेती आहे. त्यांचे शेतात ६१४११०६२७८ क्रमांकाचे विद्युत मीटर बसविण्यात आले आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१५ या कालावधीत कोणत्याही तिमाहीत विजेचा वापर ३९ युनिटपेक्षा अधिक नव्हता. मीटर बंद होते की काय कुणास ठाऊक? मात्र जून २०१५ ते २०१९ या कालावधीत चढत्या ११५५ पासून तर प्रति तिमाही ४०४४ युनिट पर्यंतचे बिल देऊन वसुली करण्यात आली. शेती तीच आणि पिकाचा प्रकारही तोच असताना वीज वापरात एवढी तफावत कशी हा एक संशोधनाचा विषय आहे. शेतकरी नाकाडे यांनी २४ जानेवारी २०२० रोजी नवीन वीज मीटरसाठी पैसे भरले. तब्बल ११ महिन्यानंतर २४ डिसें २०२० रोजी नवीन मीटर बसविण्यात आले. वर्षभरातील दोन हंगाम मिळून सहा महिने धान शेतीला विजेचा वापर होतो. मात्र २०१९ या वर्षात नाकाडे यांना चार तिमाहीचे ४०४४, ४०४४, ४०४४ व ९०० युनिट विजेचा वापर झाल्याचे बिल देण्यात आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या सहा महिन्याचा १८०७ युनिट वापराचा बिल देण्यात आला. यात डिसेंबरपासून नवीन मीटरचे वाचन होते. प्रत्यक्षात सरासरी सहा महिन्यात १८०७ युनिटचा वापर होत असेल तर ४०४४ युनिटचे बिल देणे संयुक्तिक नाही. पैसे भरणा केल्यानंतर मीटर वेळेवर बसविला असता तर सरासरी मीटर वाचनानुसार पैसे भरण्याचा प्रसंग ओढवलाच नसता. या कालावधीत पीक नसतांनाही नाहक बिलाचा भरणा करावा लागला. यापद्धतीने महावितरण कंपनीच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालयाने लुबाडणूक केल्याचा गंभीर आरोप नाकाडे यांनी केला आहे. २०१५ पासून अतिरिक्त भरलेल्या वाचनाची भरपाई महावितरण मंडळाने देण्याची मागणी त्यांनी केली आहे.