शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

महावितरणकडून लूट : शेतकऱ्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

अर्जुनी मोरगाव : विद्युत मीटर बंद असतानाही नवीन मीटर न बसवता मनमर्जी बिल आकारून महावितरण कंपनीने लुबाडणूक केल्याचा आरोप ...

अर्जुनी मोरगाव : विद्युत मीटर बंद असतानाही नवीन मीटर न बसवता मनमर्जी बिल आकारून महावितरण कंपनीने लुबाडणूक केल्याचा आरोप ताडगाव येथील शेतकरी विनायक केवळराम नाकाडे यांनी केला आहे.

तक्रारकर्ते नाकाडे यांची अर्जुनी मोरगाव शिवारात शेती आहे. ते धान पीक घेतात. त्यांच्याकडे पावणेतीन एकर शेती आहे. त्यांचे शेतात ६१४११०६२७८ क्रमांकाचे विद्युत मीटर बसविण्यात आले आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१५ या कालावधीत कोणत्याही तिमाहीत विजेचा वापर ३९ युनिटपेक्षा अधिक नव्हता. मीटर बंद होते की काय कुणास ठाऊक? मात्र जून २०१५ ते २०१९ या कालावधीत चढत्या ११५५ पासून तर प्रति तिमाही ४०४४ युनिट पर्यंतचे बिल देऊन वसुली करण्यात आली. शेती तीच आणि पिकाचा प्रकारही तोच असताना वीज वापरात एवढी तफावत कशी हा एक संशोधनाचा विषय आहे. शेतकरी नाकाडे यांनी २४ जानेवारी २०२० रोजी नवीन वीज मीटरसाठी पैसे भरले. तब्बल ११ महिन्यानंतर २४ डिसें २०२० रोजी नवीन मीटर बसविण्यात आले. वर्षभरातील दोन हंगाम मिळून सहा महिने धान शेतीला विजेचा वापर होतो. मात्र २०१९ या वर्षात नाकाडे यांना चार तिमाहीचे ४०४४, ४०४४, ४०४४ व ९०० युनिट विजेचा वापर झाल्याचे बिल देण्यात आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या सहा महिन्याचा १८०७ युनिट वापराचा बिल देण्यात आला. यात डिसेंबरपासून नवीन मीटरचे वाचन होते. प्रत्यक्षात सरासरी सहा महिन्यात १८०७ युनिटचा वापर होत असेल तर ४०४४ युनिटचे बिल देणे संयुक्तिक नाही. पैसे भरणा केल्यानंतर मीटर वेळेवर बसविला असता तर सरासरी मीटर वाचनानुसार पैसे भरण्याचा प्रसंग ओढवलाच नसता. या कालावधीत पीक नसतांनाही नाहक बिलाचा भरणा करावा लागला. यापद्धतीने महावितरण कंपनीच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालयाने लुबाडणूक केल्याचा गंभीर आरोप नाकाडे यांनी केला आहे. २०१५ पासून अतिरिक्त भरलेल्या वाचनाची भरपाई महावितरण मंडळाने देण्याची मागणी त्यांनी केली आहे.