शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकलेखा समितीचे दायित्व महत्त्वपूर्ण

By admin | Updated: September 13, 2015 01:36 IST

देशात स्वातंत्र्यानंतर प्रगतीसोबत भ्रष्टाचारही वाढीस लागला. त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकशाही पद्धतीने आरूढ होणाऱ्या सरकारकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे.

अग्रवाल : दिल्लीतील संमेलनात समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभागगोंदिया : देशात स्वातंत्र्यानंतर प्रगतीसोबत भ्रष्टाचारही वाढीस लागला. त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकशाही पद्धतीने आरूढ होणाऱ्या सरकारकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. अशा परिस्थितीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकलेखा समितीचे योगदान आणि दायित्व महत्वपूर्ण ठरू शकते, असे प्रतिपादन राज्य विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.दिल्ली येथे दि.८ व ९ सप्टेंबरला संसद सभागृहात केंद्र तथा सर्व राज्यांच्या विधीमंडळ लोकलेखा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे संमेलन झाले. त्यात आ.अग्रवाल बोलत होते.या संमेलनाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले. यावेळी लोकसभा उपाध्यक्ष थम्बी दुरई, केंद्रीय संसदीय लोकलेखा समितीचे सभापती के.व्ही. थॉमस, समितीचे प्रधान सचिव मिश्रा, संमेलन संयोजक खा.निशिकांत दुबे, मुख्य वक्ता खा.दुष्यंतसिंग उपस्थित होते.यावेळी बोलताना आ.अग्रवाल म्हणाले, राज्य सरकारला समितीसाठी जास्त जबाबदार बनविणे गरजेचे आहे. या समितीच्या माध्यमातूनच विविध राज्यांमधील मंत्रालयात चालणाऱ्या भ्रष्टाचारावर अंकुश लावता येईल तसेच समितीला अधिक लोकभिमुख करता येईल. या दोन दिवसीय संमेलनात सात सत्र झाले. संमेलनाचा समारोप लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांच्या उपस्थितीत झाला. (जिल्हा प्रतिनिधी)