शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पावसामुळे पिकांना जीवदान

By admin | Updated: September 8, 2014 00:37 IST

अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती.

गोंदिया : अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती. त्यामुळे हातची पिके यंदाही गमवावी लागणार या चिंतेत शेतकरी होता. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात परतून आलेल्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. येथे सांगायचे झाल्यास मागील वर्षीची अतिवृष्टी व रबी हंगामातील गारपीट शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी पुरी आहे. मात्र जिल्ह्यातला शेतकरी जन्माला आल्यापासून या परिस्थितींचा सामना करीत मातीतून सोनं काढत असल्याने त्याला निसर्गाच्या या खेळाची सवय जडली आहे. त्यामुळेच प्रत्येक परिस्थितीशी निपटून घेत येथील शेतकरी धानाचं वाटं कधीच रित होऊ देत नाही. यंदा खरीपाच्या हंगामातही पावसाने सुरूवातीपासूनच खेळी केली. उशीरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढविले. मात्र शेतकऱ्या आहे त्या परिस्थितीचा सामना करीत शेती केलीच. येथील कृषी विभागाने २८ आॅगस्ट पर्यंतची दिलेली रोवणीची आकडेवारी बघता जिल्ह्यात १०१ टक्के रोवणी झाली होती. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ३८ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ३० हजार ५५ हे., आमगाव २० हजार २३० हे., सालेकसा १६ हजार १०४ हे., देवरी २१ हजार ०१९ हे., अर्जुनी मोरगाव २२ हजार ६६५ हे. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात भातपिकाची रोवणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर सर्व साधारण क्षेत्र आहे. मात्र यंदा एक लाख ८७ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली आहे. आजपर्यंत त्यात अधिक भर झाली असावी. मात्र पिकं आता पाचरे फुटण्याच्या स्थितीत आले असून त्यांना पाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. मात्र वेळीच पावसाने दडी मारल्याने हाती आलेली पिकं गमावण्याची भिती शेतकऱ्यांना जाणवत होती व त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त होता. अशात ऐनवेळी निसर्गाने साथ दिली व मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली. परतून आलेल्या या पावसाने पिकांची तहान भागविली असून त्यांना जीवदान दिले आहे. यामुळे शेतकरीही सुखावला असल्याचे बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)