शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

पावसामुळे पिकांना जीवदान

By admin | Updated: September 8, 2014 00:37 IST

अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती.

गोंदिया : अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती. त्यामुळे हातची पिके यंदाही गमवावी लागणार या चिंतेत शेतकरी होता. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात परतून आलेल्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. येथे सांगायचे झाल्यास मागील वर्षीची अतिवृष्टी व रबी हंगामातील गारपीट शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी पुरी आहे. मात्र जिल्ह्यातला शेतकरी जन्माला आल्यापासून या परिस्थितींचा सामना करीत मातीतून सोनं काढत असल्याने त्याला निसर्गाच्या या खेळाची सवय जडली आहे. त्यामुळेच प्रत्येक परिस्थितीशी निपटून घेत येथील शेतकरी धानाचं वाटं कधीच रित होऊ देत नाही. यंदा खरीपाच्या हंगामातही पावसाने सुरूवातीपासूनच खेळी केली. उशीरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढविले. मात्र शेतकऱ्या आहे त्या परिस्थितीचा सामना करीत शेती केलीच. येथील कृषी विभागाने २८ आॅगस्ट पर्यंतची दिलेली रोवणीची आकडेवारी बघता जिल्ह्यात १०१ टक्के रोवणी झाली होती. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ३८ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ३० हजार ५५ हे., आमगाव २० हजार २३० हे., सालेकसा १६ हजार १०४ हे., देवरी २१ हजार ०१९ हे., अर्जुनी मोरगाव २२ हजार ६६५ हे. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात भातपिकाची रोवणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर सर्व साधारण क्षेत्र आहे. मात्र यंदा एक लाख ८७ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली आहे. आजपर्यंत त्यात अधिक भर झाली असावी. मात्र पिकं आता पाचरे फुटण्याच्या स्थितीत आले असून त्यांना पाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. मात्र वेळीच पावसाने दडी मारल्याने हाती आलेली पिकं गमावण्याची भिती शेतकऱ्यांना जाणवत होती व त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त होता. अशात ऐनवेळी निसर्गाने साथ दिली व मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली. परतून आलेल्या या पावसाने पिकांची तहान भागविली असून त्यांना जीवदान दिले आहे. यामुळे शेतकरीही सुखावला असल्याचे बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)