शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

चिमुकल्यांचा आहार निकृष्ट

By admin | Updated: September 14, 2015 01:38 IST

बोळदे-कवठा येथील अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार दिले जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण होईल की त्यांची वाटचाल कुपोषणाच्या दिशेने होईल, अशी समस्या पुढे आहे.

पालकांमध्ये रोष : अनियंत्रित कारभारामुळे अंगणवाडीत कर्मचाऱ्यांची मनमर्जीबाराभाटी : बोळदे-कवठा येथील अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार दिले जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण होईल की त्यांची वाटचाल कुपोषणाच्या दिशेने होईल, अशी समस्या पुढे आहे. या प्रकारामुळे गावकरी चिंतीत असून त्यांच्यामध्ये रोष पसरला आहे.४ सप्टेंबर रोजी बालकांना अंड्यांचा आहार देण्यात आला. ते अत्यंत निकृष्ट होते. ते काही बालकांनी खाण्याचा प्रयत्नही केला. ही बाब पालकांना कळताच त्यांची याची तक्रार वरिष्ठांकडे केली. मात्र कारवाई थंडबस्त्यात आहे. साधी चौकशीसुद्धा अद्याप करण्यात आली नाही. अशा आहारामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो. सदर अंगणवाडी केंद्राचे परिसर अस्वच्छ आहे. त्या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका नेहमीच संभवतो. अंड्यांचे वरील सोल, केरकचरा व गढूळ पाणी परिसरात पसरले असते. असा प्रकार अंगणवाडी सेविका व कर्मचारी करीत आहेत. याकडे कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझरचे लक्ष नाही. सुपरवायझरसुद्धा कधीही या अंगणवाडीला भेटी देत नाही. त्यामुळे स्वत:च्या मनमर्जीने अंगणवाडी सेविका बोळदे-कवठा येथील अंगणवाडी चालविते व अरेरावीपणा करते, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. येथे बालकांच्या खिचडीमध्ये दाळ वापरली जात नाही. ती खिचडी न दिसता पाणीच दिसते. सेविका ही नियमित येत नसून सभेचा बहाणा सांगून खोळंबा करते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. याबाबत सदर अंगणवाडी सेविकेला विचारणा केली असता दुसऱ्या अंगणवाडीच्या सेविका असभ्य वर्तन करून टाळाटाळीची उत्तरे देतात. आपण काय बोलतो याचेच भान त्यांना राहत नाही तर मुले काय शिकणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. सर्वच अंगणवाडी केंद्रात अनेक समस्या असून त्या स्वत: अंगणवाडी सेविकांनीच निर्माण केल्या आहेत. बालकांना परिपूर्ण आहार मिळत नाही. खोटे बिल दाखवून शासनाचा पैसा लाटला जात आहे. बोगस बिले तयार करण्यात या अंगणवाडी सेविका अगदी कुशल असल्याचे बोलले जाते. संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळेच असे प्रकार घडत असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गोंदिया, पंचायत समितीचे सभापती व खंडविकास अधिकारी व भ्रष्टाचार निर्मूलन समिती अर्जुनी-मोरगाव यांना लेखी पत्र देवून नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)