शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

बिघांडामुळे होतेय विजेचा लपंडाव

By admin | Updated: July 1, 2016 01:42 IST

जिल्हा भारनियमनमुक्त असला तरीही वेळी-अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाने जिल्हावासी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

कंडक्टर तुटल्याने त्रास : वादळ-वाऱ्याने वाढली डोकेदुखीगोंदिया : जिल्हा भारनियमनमुक्त असला तरीही वेळी-अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाने जिल्हावासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. यामागे वाहिन्या व कंडक्टरमध्ये येत असलेला बिघाड कारणीभूत ठरत आहे. शिवाय वादळवाऱ्याने महावितरणला हैरान करून सोडल्याचेही दिसून येत आहे. यात मात्र सामान्य नागरिक चांगलाच होरपळून निघत आहे. भारनियमनाच्या जाचापासून जिल्ह्याची सुटका झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना असलेला धसका आता नाहीसा झाला आहे. मात्र विजेचा लपंडाव कमी झालेला नाही. त्यात उन्हाळ््याच्या दोन महिन्यांत उन्हाने चांगलेच शेकून काढले असतानाच महावितरणचेही वादळीवाऱ्याने चांगलेच नुकसान केले. पाऊस तर पाहिजे तसा बरसला नाही. त्यामुळे उकाडा अद्याप जिल्हावासीयांना शेकून काढत आहे. अशात एका मिनीटालाही वीज पुरवठा खंडीत झाल्यास अंगावरून घामाच्या धारा वाहू लागत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरात वेळी अवेळी वीजेचा लपंडाव सुरू आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांची झोप उडाली असून महावितरणप्रती रोष व्याप्त आहे. दिवसा तर दिवसा मात्र रात्रीलाही वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले आहेत. यामागचे कारण जाणून घेतले असता कळले की, इनसुलेटर शॉट झाल्यामुळे दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. २८ जून रोजी रावणवाडी परिसरात कंडक्टर तुटून वाहिनीवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्याची दुरूस्ती करण्यासाठी वीज पुरवठा बंद करून दुरूस्ती करावी लागली. शिवाय वादळीवारा महावितरणसाठी त्रासदायक ठरत आहे. ऐनवेळी येत असलेल्या बिघाडामुळेही महावितरणला दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)