शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बिघांडामुळे होतेय विजेचा लपंडाव

By admin | Updated: July 1, 2016 01:42 IST

जिल्हा भारनियमनमुक्त असला तरीही वेळी-अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाने जिल्हावासी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

कंडक्टर तुटल्याने त्रास : वादळ-वाऱ्याने वाढली डोकेदुखीगोंदिया : जिल्हा भारनियमनमुक्त असला तरीही वेळी-अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाने जिल्हावासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. यामागे वाहिन्या व कंडक्टरमध्ये येत असलेला बिघाड कारणीभूत ठरत आहे. शिवाय वादळवाऱ्याने महावितरणला हैरान करून सोडल्याचेही दिसून येत आहे. यात मात्र सामान्य नागरिक चांगलाच होरपळून निघत आहे. भारनियमनाच्या जाचापासून जिल्ह्याची सुटका झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना असलेला धसका आता नाहीसा झाला आहे. मात्र विजेचा लपंडाव कमी झालेला नाही. त्यात उन्हाळ््याच्या दोन महिन्यांत उन्हाने चांगलेच शेकून काढले असतानाच महावितरणचेही वादळीवाऱ्याने चांगलेच नुकसान केले. पाऊस तर पाहिजे तसा बरसला नाही. त्यामुळे उकाडा अद्याप जिल्हावासीयांना शेकून काढत आहे. अशात एका मिनीटालाही वीज पुरवठा खंडीत झाल्यास अंगावरून घामाच्या धारा वाहू लागत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरात वेळी अवेळी वीजेचा लपंडाव सुरू आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांची झोप उडाली असून महावितरणप्रती रोष व्याप्त आहे. दिवसा तर दिवसा मात्र रात्रीलाही वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले आहेत. यामागचे कारण जाणून घेतले असता कळले की, इनसुलेटर शॉट झाल्यामुळे दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. २८ जून रोजी रावणवाडी परिसरात कंडक्टर तुटून वाहिनीवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्याची दुरूस्ती करण्यासाठी वीज पुरवठा बंद करून दुरूस्ती करावी लागली. शिवाय वादळीवारा महावितरणसाठी त्रासदायक ठरत आहे. ऐनवेळी येत असलेल्या बिघाडामुळेही महावितरणला दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)