शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानाने दुसऱ्याचे जीवन फुलते

By admin | Updated: January 16, 2017 00:23 IST

आपल्या मदतीने मृत्युशय्येवर असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर नवसंजीवनीचे हास्य फुलण्याचे भाग्य

राजेश चांडक यांचे प्रतिपादन : ८५ विद्यार्थ्यांनी केले शिबिरात रक्तदान बोंडगावदेवी : आपल्या मदतीने मृत्युशय्येवर असलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर नवसंजीवनीचे हास्य फुलण्याचे भाग्य लाभणे हेच महत्तम कार्य आहे. सर्व दानात रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे दुसऱ्यांचे जिवन फुलविण्याचे महान पुण्य मिळत असल्याचे मत रासेयोचे शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक यांनी व्यक्त केले. स्थानिक बाजारचौक स्थित सार्वजनिक समाज मंदिरात राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांतर्गत आयोजीत रक्तदान शिबिरात ते बोलत होते. रक्तदान शिबिराच्या शुभारंभाप्रसंगी एस.एस.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर, सरपंच राधेशाम झोळे, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, रक्त संक्रमण केंद्राचे प्रवीण साठवणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, राज्यस्तरीय रासेयो शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक, डॉ. शरद मेश्राम, प्रा.आशिष कावळे, डॉ.पी.एस.डांगे, डॉ. दिलीप काकडे उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलनाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना चांडक यांनी, घरी आलेल्या भिकाऱ्याला अन्नधान्य देणे तसेच आत्मस्वकीयांना संकटकाळात सर्वत्तोपरी मदत करण्यासाठी हात पुढे करण्याची गरज आहे. विविध ठिकाणी दान करणे ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र आपण केलेल्या एखाद्या मदतीने दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होणे हे महत्वाचे असे मत व्यक्त केले. आजचा युवक समाजाचा आधारस्तंभ आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून समाजाच्या फार अपेक्षा असतात. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या ओळखून युवकांनी पुढे यावे. रक्तदान या राष्ट्रीय कार्यात युवकांनी सहभागी होऊन स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्यास तत्पर असावे. तुम्ही केलेल्या रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते असेही मत डॉ. चांडक यांनी व्यक्त केले. याप्रसंगी समाजासाठी आपलेही काही देणे लागते याचे भान ठेवण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य पाटणकर यांनी केले. याप्रसंगी ८५ जणांनी रक्तदान केले. ग्रामोन्नतीकरीता युवाशक्ती या संकल्पनेवर आधारीत असलेल्या रासेयोच्या शिबिरामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधून जवळपास २५० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. शरद मेश्राम, प्रा.आशिष कावळे, देवदास बाळबुध्दे यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)