शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सावकारांनी कर्जग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्वरित सादर करावे-सूर्यवंशी

By admin | Updated: June 3, 2015 01:13 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ज्या परवाना धारक जिल्ह्यातील सावकारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी कर्ज घेतले असल्यास ३० जून २०१५ पर्यंतचे कर्ज व त्यावरील शासनाने निर्धारित केलेल्या दराने व्याज संबंधित सावकाराला शासनाद्वारे परत करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सावकाराच्या कर्जातून मुक्तता होणार आहे.लाभार्थी शेतकऱ्यांकडे सातबारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने सावरकाराकडून कर्ज घेतले असले तरी असे शेतकरी हे या योजनेचा लाभ घेवू शकतील. ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे. परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेलफी पगारदार व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती व मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र राहणार नाही.जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांनी कर्जदार शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्जदार सदस्याशी संपर्क करुन त्याचे प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयामध्ये सादर करावे. प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी तालुका पातळीवरील गठीत समितीद्वारे करण्यात येईल. तालुकास्तरीय गठीत समितीमध्ये तहसीलदार हे अध्यक्ष, सहकारी संस्थेचे लेखापरिक्षक हे सदस्य आणि सहायक निबंधक हे सदस्य सचिव असून या समितीने छाननी करुन शिफारस केलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असून जिल्हा पोलीस अधीक्षक व सहकारी संस्थुेचे विशेष लेखा परीक्षक हे सदस्य आहे. जिल्हा उपनिबंधक हे सहकारी संस्थाचे सदस्य सचिव आहेत.परवानाधारक सावरकारांनी शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्वरित सहायक निबंधक कार्यालयामध्ये सादर करावे. योजनेच्या अंमलबजावणीत हयगय झाल्यास संबंधित सावकाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)