शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ

By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST

आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला.

सालेकसा : आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला. पाच राज्यातील भाषा तज्ञ प्रतिनिधींच्या विशेष उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडी संस्कृतीचे संशोधक धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांच्या अध्यक्षतेत माजी आयुक्त डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्र्रसंगी भाषा संशोधन प्रकल्पाचे संयोजक व गोंडवाना दर्शन मासीक पत्रिकेचे संस्थापक सुन्हेरसिंह ताराम, महाराष्ट्रातील जेष्ठ लेखिका व कवयित्री तसेच संशोधन केंद्राच्या मुख्य सूत्रधार उषाकिरण आत्राम, गोंडवाना दर्शनचे संपादक बी.एल.कोर्राम, लिंगोदर्शनचे संपादक कोमलसिंह मरई, आंध्रप्रदेशचे भाषा संशोधक माणिकराव अरके, छत्तीसगड येथील भाषा विकास केंद्राचे संयोजक आचला गुरूजी, इलाहाबाद (उ.प्र.) येथील रामनाय ओईमा, चुन्नीलाल राऊत व इतर गणमान्य लेखक, संशोधक, कवि व आदिवासी भाषेचे अभ्यासक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना ताराम यांनी भारतात मायभाषा, बोली भाषा व आदिवासी क्षेत्राची गोंडी व हल्बी भाषा किती महत्वाची आहे. परंतु काळानुसार या भाषा लोप पावत आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात गोंडी धर्माचार्य कंगाली म्हणाले की, एकेकाळी आपल्या देशात १७७ भाषा आणि ५४४ बोलीचा उल्लेख होता. परंतु संविधानात फक्त २२ भाषांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे भाषेचा मोठा वारसा आता आपल्या देशातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थीतीमुळे उषाकिरण आत्राम यांनी सुरू केलेले भाषा संशोधन केंद्र क्षेद्रीय भाषाना जीवनदान देणारा मैलाचा दगड सिध्द होवू शकतो. तर उद्घाटक डॉ. किरसान म्हणाले की, आदिवासी संस्कृतीमध्ये भाषेच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता सहनशीलता व भाषेचे जतन करणारे प्रेरणादायी कार्य केले जात होते. जे आज संविधान दिलेले आहे. त्याचे पालन आदिवासी समाजपूर्वीपासून करीत आलेला आहे. त्यामुळे संस्कृती व प्रकृतीचे रक्षण करण्यात आदिवासी व त्यांची भाषा किंवा माय बोली फार महत्वाची भूमिका पार पाडत राहीली आहे. याप्रसंगी विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी हिंदी, मराठी सोबतच गोंडी व हल्बी भाषेत आपले विचार प्रकट करीत आपल्या मायबोलीबद्दल आस्था प्रकट केली. कार्यक्रमाचे संचालन लेखिका उषाकिरण आत्राम यांनी केले. तर आभार नत्थु उईके यांनी मानले. याप्रसंगी विविध वृत्तपत्राचे व वृत्तवाहिण्याचे प्रतिनिधी सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाबसिंह कोवाची, सोहन उईके, सीताराम कोरेगा, जितेंद्र कोसमे, वसंतराव पेंढारे, मेसराम लिंगु, गोरेलाल सोनी, प्रल्हाद नेताम, परदेशी गावडे, देवनाथ कुंजाम, गुरूराम मडावी, दीपक कळपाते, व्यंकट पिपरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)