शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ

By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST

आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला.

सालेकसा : आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला. पाच राज्यातील भाषा तज्ञ प्रतिनिधींच्या विशेष उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडी संस्कृतीचे संशोधक धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांच्या अध्यक्षतेत माजी आयुक्त डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्र्रसंगी भाषा संशोधन प्रकल्पाचे संयोजक व गोंडवाना दर्शन मासीक पत्रिकेचे संस्थापक सुन्हेरसिंह ताराम, महाराष्ट्रातील जेष्ठ लेखिका व कवयित्री तसेच संशोधन केंद्राच्या मुख्य सूत्रधार उषाकिरण आत्राम, गोंडवाना दर्शनचे संपादक बी.एल.कोर्राम, लिंगोदर्शनचे संपादक कोमलसिंह मरई, आंध्रप्रदेशचे भाषा संशोधक माणिकराव अरके, छत्तीसगड येथील भाषा विकास केंद्राचे संयोजक आचला गुरूजी, इलाहाबाद (उ.प्र.) येथील रामनाय ओईमा, चुन्नीलाल राऊत व इतर गणमान्य लेखक, संशोधक, कवि व आदिवासी भाषेचे अभ्यासक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना ताराम यांनी भारतात मायभाषा, बोली भाषा व आदिवासी क्षेत्राची गोंडी व हल्बी भाषा किती महत्वाची आहे. परंतु काळानुसार या भाषा लोप पावत आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात गोंडी धर्माचार्य कंगाली म्हणाले की, एकेकाळी आपल्या देशात १७७ भाषा आणि ५४४ बोलीचा उल्लेख होता. परंतु संविधानात फक्त २२ भाषांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे भाषेचा मोठा वारसा आता आपल्या देशातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थीतीमुळे उषाकिरण आत्राम यांनी सुरू केलेले भाषा संशोधन केंद्र क्षेद्रीय भाषाना जीवनदान देणारा मैलाचा दगड सिध्द होवू शकतो. तर उद्घाटक डॉ. किरसान म्हणाले की, आदिवासी संस्कृतीमध्ये भाषेच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता सहनशीलता व भाषेचे जतन करणारे प्रेरणादायी कार्य केले जात होते. जे आज संविधान दिलेले आहे. त्याचे पालन आदिवासी समाजपूर्वीपासून करीत आलेला आहे. त्यामुळे संस्कृती व प्रकृतीचे रक्षण करण्यात आदिवासी व त्यांची भाषा किंवा माय बोली फार महत्वाची भूमिका पार पाडत राहीली आहे. याप्रसंगी विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी हिंदी, मराठी सोबतच गोंडी व हल्बी भाषेत आपले विचार प्रकट करीत आपल्या मायबोलीबद्दल आस्था प्रकट केली. कार्यक्रमाचे संचालन लेखिका उषाकिरण आत्राम यांनी केले. तर आभार नत्थु उईके यांनी मानले. याप्रसंगी विविध वृत्तपत्राचे व वृत्तवाहिण्याचे प्रतिनिधी सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाबसिंह कोवाची, सोहन उईके, सीताराम कोरेगा, जितेंद्र कोसमे, वसंतराव पेंढारे, मेसराम लिंगु, गोरेलाल सोनी, प्रल्हाद नेताम, परदेशी गावडे, देवनाथ कुंजाम, गुरूराम मडावी, दीपक कळपाते, व्यंकट पिपरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)