शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचीे नियोजनशुन्यता आणि अधिकारी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी ...

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय चालविले जात असते. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेहमी ‘चलती का नाम गाडी’ ही म्हण सिद्ध करणारे ठरत असते.

दरवर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागताच खरीप हंगामाला सुरुवात होते. बळीराजा आपली बी पेरणीची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या विकल्पांचा विचार करतो. यंदा कोणत्या शेतात कोणते वाण टाकावे, किती टाकावे, सोबतच बाजारात कोणते नवीन वाण उपलब्ध आहे, त्याची शाश्वती किती, याचे नियोजन करतो. त्यानंतर ८ जून रोजी मृग नक्षत्र लागताच शेतकरी धान बियाण्याच्या पेरणीला सुरुवात करतो. अशात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केले पाहिजे. धानाची किंवा इतर पिकांची खरीप हंगामात उत्पादकता कशी वाढवता येईल, याबद्दल यथोचित मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना कधीच वेळेवर मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऐनवेळी योग्य सल्ल्याअभावी आपल्या शेतीच्या नियोजनास मुकतो.

बॉक्स

कालबाह्य वाणाचे उशिरा अनुदान

बदलत्या काळानुसार शेतीतसुद्धा बदल आवश्यक झाला असून, उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित आणि संकरित धानाच्या वाणाचे प्रयोग करण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. परंतु शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्या आणि कालबाह्य झालेल्या वाणासाठीच असते. तेही पेरणी झाल्यावर उपलब्ध केले जाते. परिणामी शासनाचे अनुदान नावापुरते ठरते. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही.

कार्यालयात असतो नेहमी शुकशुकाट

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जेव्हा शेतकरी शासनाच्या काही योजना आहेत का, कोणत्या वेळी कोणते काम प्राधान्याने करावे व इतर बाबी विचारायला पोहोचतो तेव्हा-तेव्हा कृषी अधिकारी कार्यालयातून बेपत्ता असतात, तर इतर सहायक कर्मचारीसुद्धा ठिकाणावर नसतात. नेहमी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शुकशुकाट असतो. एक-दोन कर्मचारी असले तर ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मुळीच लक्ष न देता टालमटोल उत्तरे देत असतात. अशात या कार्यालयाचा उपयोग काय? असे मनात वाटते. सध्या लॉकडाऊन काळाचा अपवाद वगळला तरी वर्षभर कार्यालयात अनियमितता दिसून येते.