शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचीे नियोजनशुन्यता आणि अधिकारी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी ...

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय चालविले जात असते. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेहमी ‘चलती का नाम गाडी’ ही म्हण सिद्ध करणारे ठरत असते.

दरवर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागताच खरीप हंगामाला सुरुवात होते. बळीराजा आपली बी पेरणीची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या विकल्पांचा विचार करतो. यंदा कोणत्या शेतात कोणते वाण टाकावे, किती टाकावे, सोबतच बाजारात कोणते नवीन वाण उपलब्ध आहे, त्याची शाश्वती किती, याचे नियोजन करतो. त्यानंतर ८ जून रोजी मृग नक्षत्र लागताच शेतकरी धान बियाण्याच्या पेरणीला सुरुवात करतो. अशात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केले पाहिजे. धानाची किंवा इतर पिकांची खरीप हंगामात उत्पादकता कशी वाढवता येईल, याबद्दल यथोचित मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना कधीच वेळेवर मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऐनवेळी योग्य सल्ल्याअभावी आपल्या शेतीच्या नियोजनास मुकतो.

बॉक्स

कालबाह्य वाणाचे उशिरा अनुदान

बदलत्या काळानुसार शेतीतसुद्धा बदल आवश्यक झाला असून, उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित आणि संकरित धानाच्या वाणाचे प्रयोग करण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. परंतु शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्या आणि कालबाह्य झालेल्या वाणासाठीच असते. तेही पेरणी झाल्यावर उपलब्ध केले जाते. परिणामी शासनाचे अनुदान नावापुरते ठरते. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही.

कार्यालयात असतो नेहमी शुकशुकाट

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जेव्हा शेतकरी शासनाच्या काही योजना आहेत का, कोणत्या वेळी कोणते काम प्राधान्याने करावे व इतर बाबी विचारायला पोहोचतो तेव्हा-तेव्हा कृषी अधिकारी कार्यालयातून बेपत्ता असतात, तर इतर सहायक कर्मचारीसुद्धा ठिकाणावर नसतात. नेहमी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शुकशुकाट असतो. एक-दोन कर्मचारी असले तर ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मुळीच लक्ष न देता टालमटोल उत्तरे देत असतात. अशात या कार्यालयाचा उपयोग काय? असे मनात वाटते. सध्या लॉकडाऊन काळाचा अपवाद वगळला तरी वर्षभर कार्यालयात अनियमितता दिसून येते.