शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

कृषी विभागाचीे नियोजनशुन्यता आणि अधिकारी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी ...

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय चालविले जात असते. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेहमी ‘चलती का नाम गाडी’ ही म्हण सिद्ध करणारे ठरत असते.

दरवर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागताच खरीप हंगामाला सुरुवात होते. बळीराजा आपली बी पेरणीची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या विकल्पांचा विचार करतो. यंदा कोणत्या शेतात कोणते वाण टाकावे, किती टाकावे, सोबतच बाजारात कोणते नवीन वाण उपलब्ध आहे, त्याची शाश्वती किती, याचे नियोजन करतो. त्यानंतर ८ जून रोजी मृग नक्षत्र लागताच शेतकरी धान बियाण्याच्या पेरणीला सुरुवात करतो. अशात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केले पाहिजे. धानाची किंवा इतर पिकांची खरीप हंगामात उत्पादकता कशी वाढवता येईल, याबद्दल यथोचित मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना कधीच वेळेवर मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऐनवेळी योग्य सल्ल्याअभावी आपल्या शेतीच्या नियोजनास मुकतो.

बॉक्स

कालबाह्य वाणाचे उशिरा अनुदान

बदलत्या काळानुसार शेतीतसुद्धा बदल आवश्यक झाला असून, उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित आणि संकरित धानाच्या वाणाचे प्रयोग करण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. परंतु शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्या आणि कालबाह्य झालेल्या वाणासाठीच असते. तेही पेरणी झाल्यावर उपलब्ध केले जाते. परिणामी शासनाचे अनुदान नावापुरते ठरते. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही.

कार्यालयात असतो नेहमी शुकशुकाट

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जेव्हा शेतकरी शासनाच्या काही योजना आहेत का, कोणत्या वेळी कोणते काम प्राधान्याने करावे व इतर बाबी विचारायला पोहोचतो तेव्हा-तेव्हा कृषी अधिकारी कार्यालयातून बेपत्ता असतात, तर इतर सहायक कर्मचारीसुद्धा ठिकाणावर नसतात. नेहमी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शुकशुकाट असतो. एक-दोन कर्मचारी असले तर ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मुळीच लक्ष न देता टालमटोल उत्तरे देत असतात. अशात या कार्यालयाचा उपयोग काय? असे मनात वाटते. सध्या लॉकडाऊन काळाचा अपवाद वगळला तरी वर्षभर कार्यालयात अनियमितता दिसून येते.