शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

कृषी विभागाचीे नियोजनशुन्यता आणि अधिकारी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:27 IST

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी ...

सालेकसा : अन्नदाता बळीराजाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाकडून कृषी विभागामार्फत स्वतंत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय चालविले जात असते. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेहमी ‘चलती का नाम गाडी’ ही म्हण सिद्ध करणारे ठरत असते.

दरवर्षी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागताच खरीप हंगामाला सुरुवात होते. बळीराजा आपली बी पेरणीची तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या विकल्पांचा विचार करतो. यंदा कोणत्या शेतात कोणते वाण टाकावे, किती टाकावे, सोबतच बाजारात कोणते नवीन वाण उपलब्ध आहे, त्याची शाश्वती किती, याचे नियोजन करतो. त्यानंतर ८ जून रोजी मृग नक्षत्र लागताच शेतकरी धान बियाण्याच्या पेरणीला सुरुवात करतो. अशात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केले पाहिजे. धानाची किंवा इतर पिकांची खरीप हंगामात उत्पादकता कशी वाढवता येईल, याबद्दल यथोचित मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. परंतु येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना कधीच वेळेवर मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी ऐनवेळी योग्य सल्ल्याअभावी आपल्या शेतीच्या नियोजनास मुकतो.

बॉक्स

कालबाह्य वाणाचे उशिरा अनुदान

बदलत्या काळानुसार शेतीतसुद्धा बदल आवश्यक झाला असून, उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित आणि संकरित धानाच्या वाणाचे प्रयोग करण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. परंतु शासनाकडून मिळणारे अनुदान जुन्या आणि कालबाह्य झालेल्या वाणासाठीच असते. तेही पेरणी झाल्यावर उपलब्ध केले जाते. परिणामी शासनाचे अनुदान नावापुरते ठरते. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही.

कार्यालयात असतो नेहमी शुकशुकाट

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जेव्हा शेतकरी शासनाच्या काही योजना आहेत का, कोणत्या वेळी कोणते काम प्राधान्याने करावे व इतर बाबी विचारायला पोहोचतो तेव्हा-तेव्हा कृषी अधिकारी कार्यालयातून बेपत्ता असतात, तर इतर सहायक कर्मचारीसुद्धा ठिकाणावर नसतात. नेहमी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शुकशुकाट असतो. एक-दोन कर्मचारी असले तर ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मुळीच लक्ष न देता टालमटोल उत्तरे देत असतात. अशात या कार्यालयाचा उपयोग काय? असे मनात वाटते. सध्या लॉकडाऊन काळाचा अपवाद वगळला तरी वर्षभर कार्यालयात अनियमितता दिसून येते.