शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा शिवाजी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:25 IST

बाराभाटी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रजाहितदक्ष जाणता राजा, यांनी १७ व्या शतकात आदिलशाही, निजामशाही व मुघलांच्या परकीय सत्तेच्या कचाट्यातून ...

बाराभाटी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रजाहितदक्ष जाणता राजा, यांनी १७ व्या शतकात आदिलशाही, निजामशाही व मुघलांच्या परकीय सत्तेच्या कचाट्यातून रयतेची सुटका करून स्वराज्याची निर्मिती नव्हे, तर सुराज्याची निर्मिती केल्यामुळे रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून शिवछत्रपतींचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरल्या गेल्याचे प्रतिपादन पदवीधर शिक्षक सु. मो. भैसारे यांनी व्यक्त केले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा, मोरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे प्रमुख मोहन नाईक, वामनराव घरतकर, अचला कापगते-झोडे, प्राची कागणे-ठाकूर उपस्थित होते. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणे राज्य करणाऱ्या राजाचे शेतीविषयक धोरण, उद्योग व व्यापारी धोरण, कामगारविषयक धोरण, लष्करी धोरण प्रचलित शासन व्यवस्थेसाठी अनुकरणीय असून, सक्षम राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यासाठी इतिहासाचा बोध घेऊन, सुराज्य निर्मितीसाठी समाज व्यवस्थेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम गहाणे यांनी मांडले. सूत्रसंचालन जितेंद्र ठवकर यांनी केले तर आभार मोहन नाईक यांनी केले. कार्यक्रमासाठी यश लाडे, मुक्ताई लोदी, कृतिका लाडे, कशक शहारे, काजल रावेकार, भावेश जनबंधू, सायली अंबादे, उमा राऊत यांनी सहकार्य केले.