शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बचत गटातील खिचडी वाटपात ‘खिचडी’

By admin | Updated: February 13, 2016 01:16 IST

शासनाकडून शाळेत किंवा अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना खिचडी दिली जाते. याची संपूर्ण जबाबदारी शाळेत कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडी सेविकेकडे दिली आहे.

ओ.बी. डोंगरवार ल्ल शासनाकडून शाळेत किंवा अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना खिचडी दिली जाते. याची संपूर्ण जबाबदारी शाळेत कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडी सेविकेकडे दिली आहे. मात्र खिचडीमध्ये अनेक प्रकार समोर आल्याने शेवटी गावातील बचतगटाला खिचडी वाटपाचे काम देण्यात आले. मात्र या खिचडी वाटपातही बचत गटाकडून ‘खिचडी’ सुरू असल्याने याची संपूर्ण चौकशी होणे तेवढेच गरजेचे झाले आहे.शाळेला विद्यार्थी संख्येनुसार धान्य पुरवठा केला जातो. यावर शाळेतून महिन्याचा गोषवारा काढून केंद्र प्रमुखाकडे दिला जातो. वास्तविक शाळेला दिलेल्या धान्याचा संपूर्ण तपशील काढला तर खिचडीमध्ये कशी ‘खिचडी’ शिजते हे दिसून येते. केंद्र प्रमुख गोषवारा प्रत्यक्षात तपासून बघत नाही. याला कारण खिचडीच्या अहवालात केंद्रप्रमुख आपलीही पोळी भाजून घेतात. समजा एखाद्या केंद्रप्रमुखाकडे पाच शाळा तपासणीसाठी दिल्या तर महिन्याची केंद्रप्रमुखाची खिचडी चांगली शिजते. शाळेला दिलेला धान्य पुरवठा महिन्याकाठी शिल्लक राहतो. तेथे शाळेतील मुख्याध्यापक आपली खिचडी पकवितात. मध्यंतरीच्या काळात खिचडी वाटपाचे काम मुख्याध्यापकाकडे दिले होते. तेथे दोन गट तयार झाले. काही शिक्षक मुख्याध्यापकाच्या विरोधात कुरकुरत होते. त्यामुळे शाळेत वातावरण चांगले खेळीमेळीचे असावे याकरिता गावातील महिला बचत गटांना खिचडी वाटपाचे काम देण्यात आले. शाळेतील खिचडी वाटपाचा संपूर्ण तपशील केंद्रप्रमुखाकडे असतो. अंगणवाडीतील खिचडी तपासणीचे काम एकात्मिक बालविकास प्रकल्पात कार्यरत अधिकारी किंवा अधिनस्त कर्मचारी करतात. मात्र ठिकठिकाणच्या अंगणवाडीतील विद्यार्थी संख्या बघता बचतगट व अधिकारी यांच्या साठगाठमुळे त्यांच्याचही चांगली खिचडी शिजते. गावातील काही विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांचे नाव अंगणवाडीत दाखवून खिचडीचा पैसा उचल केला जातो. अंगणवाडीतील सेविका किंवा चपराशी जे विद्यार्थी बाहेर शिकतात त्यांच्या घरी जाऊन आहाराच्या विद्यार्थी यादीवर पालकांच्या सह्या घेऊन खिचडी शिजविण्याचा प्रयत्न करतात. तालुक्यातील एका गावातील विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये आहे. मात्र त्याच विद्यार्थ्याचे नाव अंगणवाडीतील हजेरीपटावर दाखवून खिचडी वाटप केल्या गेल्याची नोंद होत आहे. यावर सुज्ञ पालकांनी माझा मुलगा दुसऱ्या शाळेत शिकत आहे, मग त्याचे नाव अंगणवाडीत कसे दाखविले जात आहे, अशी विचारणा करताच ‘खिचडीत खिचडी’ शिजते, असे सांगून पालकांची सांत्वना केली जात आहे.ही स्थिती प्रत्येक गावातील शाळा व अंगणवाडीत दिसत आहे. यात खिचडी तयार करणारा बचतगट, कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडीतील सेविका तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील सुपरवायझर, केंद्रप्रमुख अशी साखळी आपली खिचडी शिजवून घेत आहेत. एकंदरित या खिचडीच्या आहाराची कसून तपासणी केली तर यात मोठी साखळी काम करीत असल्याचे दिसून येईल. शाळा किंवा अंगणवाडीला जो आहार पुरविला जातो, त्याची महिन्याच्या शेवटी इतरत्र वाट लावली जाते. तिथे पण खिचडीच्या आहारात गैरप्रकार करण्याचा प्रकार खुलेआम सुरु आहे. गोरगरिबांची मुले कुपोषित राहू नये, सर्वांना जीवनसत्व मिळावे, बुद्धीचा विकास व्हावा, ज्ञानात भर पडावी, विद्यार्थी हूशार व्हावे, शरीर सुदृढ व मजबूत व्हावे व बुध्यांक वाढावा असा दूरदृष्टीकोन समोर ठेवून शासनाने शाळा व अंगणवाडीत खिचडी सुरू केली. मात्र दूरदृष्टिकोनाचा उद्देश बाजुला राहून संबंधित योजना राबविणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांना तसेच बचतगटांना सुगीचे दिवस आले. अशाप्रकारे खिचडीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ तसेच अनियमितता आहे. असे असताना सर्वकाही बरोबर आहे असे प्रशासनातील अधिकारी दाखवितात. बचतगटांना खिचडी शिजविण्याकरिता त्यांना योग्य मोबदला दिला जातो. मात्र त्यापेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन बचतगट खिचडीत खिचडी करुन आपले चांगभलं करण्याची भूमिका घेत आहेत. यात बहुतांश महिला बचतगटांची भूमिका संशयास्पद नाही. काही गावात खूप पारदर्शकता आहे हे नाकारता येणार नाही. मात्र एका बचत गटामुळे इतर ठिकाणी खिचडीत खिचडी चांगल्या प्रकारे शिजविली जाते. यामुळे बोगस नावे दाखवून शासनाच्या सकस आहार योजनेला पूर्णपणे हडपण्याचा हा प्रकार सुरू आहे. याकरिता वाटप यंत्रणा बदलविणे गरजेचे आहे. तपासणी अधिकारी बदलविणे गरजेचे आहे. तेव्हाच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी मिळेल व खिचडीच्या नावावर शिजतअसलेली दुसरीच खिचडी शिजविणे थांबेल.