शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटातील खिचडी वाटपात ‘खिचडी’

By admin | Updated: February 13, 2016 01:16 IST

शासनाकडून शाळेत किंवा अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना खिचडी दिली जाते. याची संपूर्ण जबाबदारी शाळेत कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडी सेविकेकडे दिली आहे.

ओ.बी. डोंगरवार ल्ल शासनाकडून शाळेत किंवा अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना खिचडी दिली जाते. याची संपूर्ण जबाबदारी शाळेत कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडी सेविकेकडे दिली आहे. मात्र खिचडीमध्ये अनेक प्रकार समोर आल्याने शेवटी गावातील बचतगटाला खिचडी वाटपाचे काम देण्यात आले. मात्र या खिचडी वाटपातही बचत गटाकडून ‘खिचडी’ सुरू असल्याने याची संपूर्ण चौकशी होणे तेवढेच गरजेचे झाले आहे.शाळेला विद्यार्थी संख्येनुसार धान्य पुरवठा केला जातो. यावर शाळेतून महिन्याचा गोषवारा काढून केंद्र प्रमुखाकडे दिला जातो. वास्तविक शाळेला दिलेल्या धान्याचा संपूर्ण तपशील काढला तर खिचडीमध्ये कशी ‘खिचडी’ शिजते हे दिसून येते. केंद्र प्रमुख गोषवारा प्रत्यक्षात तपासून बघत नाही. याला कारण खिचडीच्या अहवालात केंद्रप्रमुख आपलीही पोळी भाजून घेतात. समजा एखाद्या केंद्रप्रमुखाकडे पाच शाळा तपासणीसाठी दिल्या तर महिन्याची केंद्रप्रमुखाची खिचडी चांगली शिजते. शाळेला दिलेला धान्य पुरवठा महिन्याकाठी शिल्लक राहतो. तेथे शाळेतील मुख्याध्यापक आपली खिचडी पकवितात. मध्यंतरीच्या काळात खिचडी वाटपाचे काम मुख्याध्यापकाकडे दिले होते. तेथे दोन गट तयार झाले. काही शिक्षक मुख्याध्यापकाच्या विरोधात कुरकुरत होते. त्यामुळे शाळेत वातावरण चांगले खेळीमेळीचे असावे याकरिता गावातील महिला बचत गटांना खिचडी वाटपाचे काम देण्यात आले. शाळेतील खिचडी वाटपाचा संपूर्ण तपशील केंद्रप्रमुखाकडे असतो. अंगणवाडीतील खिचडी तपासणीचे काम एकात्मिक बालविकास प्रकल्पात कार्यरत अधिकारी किंवा अधिनस्त कर्मचारी करतात. मात्र ठिकठिकाणच्या अंगणवाडीतील विद्यार्थी संख्या बघता बचतगट व अधिकारी यांच्या साठगाठमुळे त्यांच्याचही चांगली खिचडी शिजते. गावातील काही विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांचे नाव अंगणवाडीत दाखवून खिचडीचा पैसा उचल केला जातो. अंगणवाडीतील सेविका किंवा चपराशी जे विद्यार्थी बाहेर शिकतात त्यांच्या घरी जाऊन आहाराच्या विद्यार्थी यादीवर पालकांच्या सह्या घेऊन खिचडी शिजविण्याचा प्रयत्न करतात. तालुक्यातील एका गावातील विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये आहे. मात्र त्याच विद्यार्थ्याचे नाव अंगणवाडीतील हजेरीपटावर दाखवून खिचडी वाटप केल्या गेल्याची नोंद होत आहे. यावर सुज्ञ पालकांनी माझा मुलगा दुसऱ्या शाळेत शिकत आहे, मग त्याचे नाव अंगणवाडीत कसे दाखविले जात आहे, अशी विचारणा करताच ‘खिचडीत खिचडी’ शिजते, असे सांगून पालकांची सांत्वना केली जात आहे.ही स्थिती प्रत्येक गावातील शाळा व अंगणवाडीत दिसत आहे. यात खिचडी तयार करणारा बचतगट, कार्यरत मुख्याध्यापक किंवा अंगणवाडीतील सेविका तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील सुपरवायझर, केंद्रप्रमुख अशी साखळी आपली खिचडी शिजवून घेत आहेत. एकंदरित या खिचडीच्या आहाराची कसून तपासणी केली तर यात मोठी साखळी काम करीत असल्याचे दिसून येईल. शाळा किंवा अंगणवाडीला जो आहार पुरविला जातो, त्याची महिन्याच्या शेवटी इतरत्र वाट लावली जाते. तिथे पण खिचडीच्या आहारात गैरप्रकार करण्याचा प्रकार खुलेआम सुरु आहे. गोरगरिबांची मुले कुपोषित राहू नये, सर्वांना जीवनसत्व मिळावे, बुद्धीचा विकास व्हावा, ज्ञानात भर पडावी, विद्यार्थी हूशार व्हावे, शरीर सुदृढ व मजबूत व्हावे व बुध्यांक वाढावा असा दूरदृष्टीकोन समोर ठेवून शासनाने शाळा व अंगणवाडीत खिचडी सुरू केली. मात्र दूरदृष्टिकोनाचा उद्देश बाजुला राहून संबंधित योजना राबविणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांना तसेच बचतगटांना सुगीचे दिवस आले. अशाप्रकारे खिचडीच्या वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ तसेच अनियमितता आहे. असे असताना सर्वकाही बरोबर आहे असे प्रशासनातील अधिकारी दाखवितात. बचतगटांना खिचडी शिजविण्याकरिता त्यांना योग्य मोबदला दिला जातो. मात्र त्यापेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन बचतगट खिचडीत खिचडी करुन आपले चांगभलं करण्याची भूमिका घेत आहेत. यात बहुतांश महिला बचतगटांची भूमिका संशयास्पद नाही. काही गावात खूप पारदर्शकता आहे हे नाकारता येणार नाही. मात्र एका बचत गटामुळे इतर ठिकाणी खिचडीत खिचडी चांगल्या प्रकारे शिजविली जाते. यामुळे बोगस नावे दाखवून शासनाच्या सकस आहार योजनेला पूर्णपणे हडपण्याचा हा प्रकार सुरू आहे. याकरिता वाटप यंत्रणा बदलविणे गरजेचे आहे. तपासणी अधिकारी बदलविणे गरजेचे आहे. तेव्हाच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी मिळेल व खिचडीच्या नावावर शिजतअसलेली दुसरीच खिचडी शिजविणे थांबेल.