शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

१ लाख ९१ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:26 IST

मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलागवड क्षेत्रात वाढ : ६२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्र लागवड योग्य आहे. तर यापैकी ९८ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यातील एकूण लागवड योग्य क्षेत्रापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर धानासह इतर पिकांची लागवड केली जाणार आहे. तर मागील वर्षी १ लाख ५२ हजार २५० हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुुलनेत यंदा लागवड क्षेत्रात ४८ हजार ४१३ हेक्टरने वाढ झाली आहे.जिल्ह्यात सरासरी ११३४ मि.मी.पाऊस पडत असल्याने धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सरासरी ९०० ते १००० मि.मी.पावसाची गरज असते. तर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि मामा तलावांची सुध्दा शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते.त्यामुळे शेतकरी इतर पिकांऐवजी धान लागवडीवर अधिक भर देतात. तर खरीपानंतर रब्बी हंगामातही जवळपास २८ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानासह, तूर, मुंग, उडीद या पिकांची सुध्दा लागवड केली जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि किटकनाशकांच्या टंचाईला तोंड द्यावे लागू नये यासाठी त्यांचे सुध्दा नियोजन कृषी विभागाने केले आहे.खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या ७१ हजार मेट्रीक टन खताची तर ६२ हजार ५४० क्विंटल धानासह इतर बियाणांची मागणी कृषी विभागाने केली आहे.यापैकी काही प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध सुध्दा झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस झाल्यास धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.