शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

१ लाख ९१ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:26 IST

मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलागवड क्षेत्रात वाढ : ६२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्र लागवड योग्य आहे. तर यापैकी ९८ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यातील एकूण लागवड योग्य क्षेत्रापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर धानासह इतर पिकांची लागवड केली जाणार आहे. तर मागील वर्षी १ लाख ५२ हजार २५० हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुुलनेत यंदा लागवड क्षेत्रात ४८ हजार ४१३ हेक्टरने वाढ झाली आहे.जिल्ह्यात सरासरी ११३४ मि.मी.पाऊस पडत असल्याने धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सरासरी ९०० ते १००० मि.मी.पावसाची गरज असते. तर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि मामा तलावांची सुध्दा शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते.त्यामुळे शेतकरी इतर पिकांऐवजी धान लागवडीवर अधिक भर देतात. तर खरीपानंतर रब्बी हंगामातही जवळपास २८ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानासह, तूर, मुंग, उडीद या पिकांची सुध्दा लागवड केली जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि किटकनाशकांच्या टंचाईला तोंड द्यावे लागू नये यासाठी त्यांचे सुध्दा नियोजन कृषी विभागाने केले आहे.खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या ७१ हजार मेट्रीक टन खताची तर ६२ हजार ५४० क्विंटल धानासह इतर बियाणांची मागणी कृषी विभागाने केली आहे.यापैकी काही प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध सुध्दा झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस झाल्यास धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.