शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंसाठी धावणारे खालसा सेवा दल सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST

गोंदिया : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक, गरजवंत तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. पण, ...

गोंदिया : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक, गरजवंत तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. पण, या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलाने घेतली. दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरणाचे कार्य केले. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेत आश्रयास असलेल्या भिकाऱ्यांसह शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रुग्णांच्या नातेवाइकांना खालसा सेवा दलाकडून जेवण पुरविले जात आहे. ही सेवा केवळ लॉकडाऊनपुरतीच मर्यादित न ठेवता ती सातत्याने सुरू ठेवली आहे.

कोरोनाचा कहर वाढल्यामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेल्या प्रवासी आणि शहरातील भिकारी आणि निराधार नागरिकांना बसला. सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली होती. कोठे निघताही येत नाही अशा स्थितीत ते अडकले आहेत. त्यांची ही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलाने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली. खालसा सेवा दलाकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे. याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिली जात आहेत. केटीएस व बाई गंगाबाई रुग्णालय व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलाची विशेष गाडी जात आहे. अन्य रुग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहोचवत होते. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे आणि पॅकेट बनविण्यासाठी सुमारे ७०-८० महिला-पुरुषांची टीम सेवा देत होती. लॉकडाऊनच्या काळात दररोज तीन हजार गरजूंना जेवण देण्याचे महान कार्य खालसा सेवा दलाने केले.

.............

२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेत

येथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रुग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रुग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलाच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.

............

रुग्णांसह अनेकांना होतेय मदत

खालसा सेवा दलाकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकांवर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र, आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली. दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे अजूनही केटीएस, बीजीडब्ल्यूमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना नियमित जेवणाचा पुरवठा केला जातो. लॉकडाऊनच्या काळात खालसा सेवा दलाच्या या पुढाकाराने अनेकांना दिलासा मिळाला आहे.