शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंसाठी धावणारे खालसा सेवा दल सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST

गोंदिया : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक, गरजवंत तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. पण, ...

गोंदिया : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक, गरजवंत तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. पण, या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलाने घेतली. दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरणाचे कार्य केले. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेत आश्रयास असलेल्या भिकाऱ्यांसह शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रुग्णांच्या नातेवाइकांना खालसा सेवा दलाकडून जेवण पुरविले जात आहे. ही सेवा केवळ लॉकडाऊनपुरतीच मर्यादित न ठेवता ती सातत्याने सुरू ठेवली आहे.

कोरोनाचा कहर वाढल्यामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेल्या प्रवासी आणि शहरातील भिकारी आणि निराधार नागरिकांना बसला. सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली होती. कोठे निघताही येत नाही अशा स्थितीत ते अडकले आहेत. त्यांची ही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलाने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली. खालसा सेवा दलाकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे. याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिली जात आहेत. केटीएस व बाई गंगाबाई रुग्णालय व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलाची विशेष गाडी जात आहे. अन्य रुग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहोचवत होते. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे आणि पॅकेट बनविण्यासाठी सुमारे ७०-८० महिला-पुरुषांची टीम सेवा देत होती. लॉकडाऊनच्या काळात दररोज तीन हजार गरजूंना जेवण देण्याचे महान कार्य खालसा सेवा दलाने केले.

.............

२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेत

येथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रुग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रुग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलाच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.

............

रुग्णांसह अनेकांना होतेय मदत

खालसा सेवा दलाकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकांवर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र, आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली. दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे अजूनही केटीएस, बीजीडब्ल्यूमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना नियमित जेवणाचा पुरवठा केला जातो. लॉकडाऊनच्या काळात खालसा सेवा दलाच्या या पुढाकाराने अनेकांना दिलासा मिळाला आहे.