शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

केशोरी प्रमुख रस्ता झाला खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

केशोरी : गावामधून तालुक्याला जाणारा प्रमुख रस्ता खड्डेमय झाला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. बऱ्याच दिवसांपासून या महत्त्वाच्या रस्त्यावर ...

केशोरी : गावामधून तालुक्याला जाणारा प्रमुख रस्ता खड्डेमय झाला असून अपघाताला आमंत्रण देत आहे. बऱ्याच दिवसांपासून या महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु, वाहतुकीची वर्दळ अधिक असल्याने या रस्त्याची स्थिती जैसे थे झाली आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

या रस्त्यावरून एखादा अपघात होवून त्यामध्ये एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. तसेच या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अनेक दिवसांपासून केशोरीच्या मधोमध जाणाऱ्या प्रमुख गावरस्त्यावर खड्डे पडले आहेत. मध्येच ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्यामुळे आचारसंहिता आड आली होती. परंतु, आता ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडून नवीन गावकारभाऱ्यांनी गावविकासाची सूत्रे सांभाळली आहेत. त्यामुळे नव्या दमाने गावातील प्रमुख रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याने रात्रंदिवस वाहने धावत असून शालेय विद्यार्थीसुध्दा दिवसभर जाणे येणे असते. या रस्त्याच्या वर्दळीचे प्रमाण लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नातून रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून बायपास रस्ता मंजूर करुन घाईघाईने रस्ता निर्मितीच्या कार्याचे भूमिपूजनही उरकले होते. परंतु, त्या बायपास रस्तानिर्मितीचे कार्य प्रलंबित आहे. बायपास रस्ता निर्मितीचे घोडे कुठे अडले , याचा अजून थांगपत्ता नाही. हे फक्त राजकीय मंडळीच सांगू शकतील. गावातील प्रमुख रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना व वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.