शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस पाटलांसाठी लढा देणार कामगार पोलीस पाटील संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST

गोंदिया : ग्राम पोलीस अधिनियम १९६७ अंतर्गत पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु, पोलीस पाटील पद स्थापनेपासूनच ...

गोंदिया : ग्राम पोलीस अधिनियम १९६७ अंतर्गत पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु, पोलीस पाटील पद स्थापनेपासूनच त्यांच्या समस्या वाढत गेल्या. त्या समस्या सोडविण्याकरिता ॲड. भिकाजी पाटील यांनी १९८७ ला संघटनेची स्थापना केली. त्यामुळे प्रारंभी २५ रुपये प्रति महिना मानधन मिळणाऱ्या पोलीस पाटलांचे मानधन आज ६५०० रुपये झाले, तर पोलीस पाटील हे पद शासकीय आहे. म्हणून त्यांना प्रवास भत्ता लागू करावा हा संघटनेचा आग्रह शासनाने २०१२ ला मान्य केला.

पोलीस पाटलांच्या कामात अडथळा आणल्यास भादंविच्या कलम ३५३ नुसार गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली, चंद्रपूर, अहमदनगर, धुळे, नंदूरबारसह नऊ जिल्ह्यांत विद्यमान पोलीस पाटलांना पेसा कायद्याअंतर्गत कामावरून कमी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. या कायद्याविरोधात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी शासनाकडे भक्कम बाजू मांडून विद्यमान पोलीस पाटील पदावरील पेसा कायदा मागे घेण्यास शासनाला भाग पाडले. त्यामुळे ४००० पोलीस पाटलांना अभयदान मिळाले, तर कोरोना संक्रमण काळात कर्तव्यावर असताना ज्या पोलीस पाटलांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला त्यांच्या वारसांना ५० लक्ष रुपये अनुदान मंजूर करवून घेतले. यानंतर अंगणवाडी सेविकाप्रमाणे पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्यात यावे व सेवानिवृत्त पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीची योजना लागू करावी, सेवानिवृत्तीची योजना लागू करण्यात यावी याकरिता संघटना आग्रही आहे.

........

महाराष्ट्र नागरी सेवा कायदा १९७९ नुसार बेकायदेशीर कार्यवाही

गावपातळीवर कार्य करताना पोलिसांचा माणूस म्हणून अनेक वेळा पोलीस पाटलांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक पोलीसपाटील षङ्यंत्राचे बळी पडून गुन्हे दाखल झाल्यामुळे निलंबित आहेत. अशा प्रकरणामध्ये अनेक वेळा उपविभागीय दंडाधिकारी नागरी सेवा कायदा १९७९चा अभ्यास न करता सरळ-सरळ न्यायालयाचे निर्णयाचे अधिन राहून पोलीसपाटील यांना ग्राम पोलीस अधिनियम १९६७ च्या कलम ११ नुसार निलंबित करण्यात येते असा आदेश पारीत करीत असतात. निलंबन ही केवळ व्यवस्थापकीय कार्यवाही आहे. परंतु, अशावेळी विभागीय चौकशी केल्याशिवाय त्यांना निलंबित करणे योग्य नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ नियम ४ (२) नुसार एखाद्या व्यक्तीचे हातून अपराध घडला असेल व त्यांना ४८ तास पोलीस अटकेत ठेवले असेल तरच निलंबित करता येते. परंतु, ९० टक्के प्रकरणामध्ये याचे पालन होताना दिसत नाही.

......

चुकीचे आदेश रद्द करण्याची गरज

ग्राम पोलीस अधिनियम १९६७ च्या कलम ११ चा संबंध येतो कसा. न्यायालयीन खटल्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत असते. व विनाकारण त्यांना वर्षानुवर्षे निलंबित राहावे लागते. या दरम्यान, काही पोलीसपाटील सेवानिवृत्त होऊन जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासकीय सेवकांना तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ निलंबित ठेवता येत नाही. त्यामुळे जिथे-जिथे असे आदेश पारीत करण्यात आले. तेथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी लगेचच विभागीय चौकशीचे आदेश देण्याची आवश्यकता आहे. असे राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ हे एक व्यासपीठ असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, गोंदिया जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, सचिव राजेश बन्सोड यांनी सांगितले.