शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तथागत बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, ...

अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, सन्मानमार्ग या तत्त्वानेच मानवाला उत्तम जीवन जगता आले. मानवाचे कर्म हेच माणसाला खाऊन टाकते आणि विकृती निर्माण होऊन वैमनस्य होत असते. बुद्धांनी गृहत्याग करून मानवाचे दु:ख शोधले. अशा अनेक कार्य व विचारांनी माणसे घडली आहेत. म्हणूनच, भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन कवी व आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.

बुद्ध जयंतीनिमित्त लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडी-बाराभाटी व परिवर्तनशील साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन सृजनशील वैचारिक कविसंमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित जयंती कार्यक्रम आणि सृजनशील वैचारिक कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील नामवंत कवी व साहित्यिक इ.मो. नारनवरे होते. उद्घाटन नांदेडचे प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा.डॉ. सुद्धोधन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये संतोष रामचंद्र गमरे (मुंबई), राहुल शेंडे (चूरमुरा-गडचिरोली), श्रावण सखुबाई रंगनाथ (जालना), प्रा. शीलवंतकुमार मडामे (भंडारा), अनुपमा जाधव (पालघर), सुभाष साबळे (अहमदपूर), उमा किशोर गजभिये (गोंदिया), निर्मला पुंडलिकराव भामोदे (अकोला), प्रा. रत्नाकर सुखदेवे (भंडारा), किशोरकुमार बन्सोड (गोंदिया), मुरहारी पारकर (लातूर), राहुल दहिवले (गडचिरोली), संदीप मेश्राम (गोंदिया), सोनाली सहारे, संगीता उमाकांत घोडेस्वार (चंद्रपूर), सुरेश मोटघरे (गडचिरोली), सिद्धार्थ चौधरी, होमराज जांभूळकर (भंडारा), देवेंद्र निकुरे (नागभीड), केवल पी. ऊके, रजनी ताजने, नीरज आत्राम, निर्दोष दहिवले, काव्यरत्न रावसाहेब राशीनकर (अहमदनगर) आदी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या नामवंत व नवोदित कवींनी सहभाग घेत बुद्धांचे विचार व तत्त्वज्ञान, कविता सादर केल्या. संचालन सीमा भसारकर यांनी केले. आभार सुकेशिनी बोरकर यांनी मानले.