शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

तथागत बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, ...

अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, सन्मानमार्ग या तत्त्वानेच मानवाला उत्तम जीवन जगता आले. मानवाचे कर्म हेच माणसाला खाऊन टाकते आणि विकृती निर्माण होऊन वैमनस्य होत असते. बुद्धांनी गृहत्याग करून मानवाचे दु:ख शोधले. अशा अनेक कार्य व विचारांनी माणसे घडली आहेत. म्हणूनच, भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन कवी व आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.

बुद्ध जयंतीनिमित्त लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडी-बाराभाटी व परिवर्तनशील साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन सृजनशील वैचारिक कविसंमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित जयंती कार्यक्रम आणि सृजनशील वैचारिक कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील नामवंत कवी व साहित्यिक इ.मो. नारनवरे होते. उद्घाटन नांदेडचे प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा.डॉ. सुद्धोधन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये संतोष रामचंद्र गमरे (मुंबई), राहुल शेंडे (चूरमुरा-गडचिरोली), श्रावण सखुबाई रंगनाथ (जालना), प्रा. शीलवंतकुमार मडामे (भंडारा), अनुपमा जाधव (पालघर), सुभाष साबळे (अहमदपूर), उमा किशोर गजभिये (गोंदिया), निर्मला पुंडलिकराव भामोदे (अकोला), प्रा. रत्नाकर सुखदेवे (भंडारा), किशोरकुमार बन्सोड (गोंदिया), मुरहारी पारकर (लातूर), राहुल दहिवले (गडचिरोली), संदीप मेश्राम (गोंदिया), सोनाली सहारे, संगीता उमाकांत घोडेस्वार (चंद्रपूर), सुरेश मोटघरे (गडचिरोली), सिद्धार्थ चौधरी, होमराज जांभूळकर (भंडारा), देवेंद्र निकुरे (नागभीड), केवल पी. ऊके, रजनी ताजने, नीरज आत्राम, निर्दोष दहिवले, काव्यरत्न रावसाहेब राशीनकर (अहमदनगर) आदी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या नामवंत व नवोदित कवींनी सहभाग घेत बुद्धांचे विचार व तत्त्वज्ञान, कविता सादर केल्या. संचालन सीमा भसारकर यांनी केले. आभार सुकेशिनी बोरकर यांनी मानले.