शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

तथागत बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, ...

अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, सन्मानमार्ग या तत्त्वानेच मानवाला उत्तम जीवन जगता आले. मानवाचे कर्म हेच माणसाला खाऊन टाकते आणि विकृती निर्माण होऊन वैमनस्य होत असते. बुद्धांनी गृहत्याग करून मानवाचे दु:ख शोधले. अशा अनेक कार्य व विचारांनी माणसे घडली आहेत. म्हणूनच, भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन कवी व आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.

बुद्ध जयंतीनिमित्त लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडी-बाराभाटी व परिवर्तनशील साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन सृजनशील वैचारिक कविसंमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित जयंती कार्यक्रम आणि सृजनशील वैचारिक कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील नामवंत कवी व साहित्यिक इ.मो. नारनवरे होते. उद्घाटन नांदेडचे प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा.डॉ. सुद्धोधन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये संतोष रामचंद्र गमरे (मुंबई), राहुल शेंडे (चूरमुरा-गडचिरोली), श्रावण सखुबाई रंगनाथ (जालना), प्रा. शीलवंतकुमार मडामे (भंडारा), अनुपमा जाधव (पालघर), सुभाष साबळे (अहमदपूर), उमा किशोर गजभिये (गोंदिया), निर्मला पुंडलिकराव भामोदे (अकोला), प्रा. रत्नाकर सुखदेवे (भंडारा), किशोरकुमार बन्सोड (गोंदिया), मुरहारी पारकर (लातूर), राहुल दहिवले (गडचिरोली), संदीप मेश्राम (गोंदिया), सोनाली सहारे, संगीता उमाकांत घोडेस्वार (चंद्रपूर), सुरेश मोटघरे (गडचिरोली), सिद्धार्थ चौधरी, होमराज जांभूळकर (भंडारा), देवेंद्र निकुरे (नागभीड), केवल पी. ऊके, रजनी ताजने, नीरज आत्राम, निर्दोष दहिवले, काव्यरत्न रावसाहेब राशीनकर (अहमदनगर) आदी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या नामवंत व नवोदित कवींनी सहभाग घेत बुद्धांचे विचार व तत्त्वज्ञान, कविता सादर केल्या. संचालन सीमा भसारकर यांनी केले. आभार सुकेशिनी बोरकर यांनी मानले.