शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ देणे ही सर्वांची जबाबदारी

By admin | Updated: July 18, 2016 00:07 IST

ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही.

गोंदिया : ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही. तेव्हा गावपातळीवरील गरजू लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शुक्रवारी (दि.१५) सडक-अर्जुनी पंचायत समिती सभागृहात महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. सभेला पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गट विकास अधिकारी लोकरे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, आॅगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महासमाधान शिबीराच्या माध्यमातून जवळपास ४० हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा आपला संकल्प आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी नियोजनातून काम करावे. त्यामुळे गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यातील अपंग व्यक्तीच्या स्वावलंबनासाठी २ कोटी रु पर्यंतची तरतूद केली असून अशा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियान-२०१६ राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार परळीकर यांनी, महासमाधान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी कामचुकारपणा करु नये असे सांगितले. यावेळी गजानन वाघ यांनी समाधान शिबिराच्या नियोजनाची व दिव्यांग स्वावलंबन अभियानाची माहिती दिली. महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारी आढावा बैठकीला सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, कृषी सहायक यांच्यासह यंत्रणांच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)