शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

जलयुक्त शिवारातून वाढणार सिंचन

By admin | Updated: December 20, 2015 01:55 IST

शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत.

गोंदिया : शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ५८ कामे करण्याची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ८३० कामे पूर्ण झाली असून त्यावर २६ कोटी ९८ लाख ५५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. अजून ३१ कामे प्रगतिपथावर आहेत.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून माती नालाबांधची १८ कामे करायची होती ती करण्यात आली आहे. त्या कामावर ९६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. गॅबियन स्ट्रक्चरची ३४ कामे करायची होती ती कामे पुर्ण करण्यात आली. त्या कामावर १८ लाख ९५ हजार रूपये खर्च करण्यात आले. ६२ शेततळींची कामे करायची होती. त्यातील ६० कामे झाली असून दोन कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर ६२ लाख २० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. साखळी सिमेंट बंधाऱ्यांची ११४ कामे करायची होती. यातील ५२ कामे पुर्ण झाली आहेत. १४ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामावर आतापर्यत ४ कोटी ६९ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. सिमेंट बंधारा दुरूस्तीची आठ कामे मंजूर करण्यात आली, त्यातील एक काम पूर्ण झाले तर चार प्रगतिपथावर आहेत. तीन कामे नंतर सुरू करण्यात येणार आहेत. या कामांवर २४ लाख ९० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. नाला खोलीकरण व सरळीकरणाची २४ कामे मंजूर होऊन १५ कामे पूर्ण झाली आहेत. आठ कामे नंतर सुरू होणार आहेत. या कामांवर एक कोटी ८५ लाख ७८ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. ठिकठिकाणी असलेल्या गावतलावांमधून गाळ काढण्याची शासकीय १११ कामे मंजूर झाली असून ९९ कामे पूर्ण झाली आहेत. चार कामे प्रगतिपथावर आहेत तर आठ कामे बंद आहेत. या कामावर ३ कोटी ३१ लाख २४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. सलग समतल चराची चार कामे करायची होती. ती पूर्ण झाली आहेत. त्या कामावर १५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या मामा तलावांमधील पाण्याचा वापर करण्यासाठी त्यातील गाळ काढण्याची ६२ कामे सीएसआरअंतर्गत मंजूर झाली होती. त्यातील ४६ कामे पूर्ण झाली असून १६ कामे बंद आहेत. या कामावर २ कोटी ६४ लाख ४५ हजार रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ठिंबक सिंचनाची २३९ कामे मंजूर असून ती पुर्ण करण्यात आली. त्यावर ८३ लाख ७४ हजार रूपये खर्च करण्यात आले. तुषार सिंचनाची आठ कामे मंजूर झाली होती ती कामे १ लाख ८६ हजारातून पुर्ण करण्यात आली आहेत. दोन वनतलाव मंजूर झाले. त्यातील एक काम पूर्ण झाले असून दुसरे प्रगतिपथावर आहे. यासाठी ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या विविध कामांमुळे पाण्याची पातळी निश्चितपणे वाढेल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)