शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जलयुक्त शिवारातून वाढणार सिंचन

By admin | Updated: December 20, 2015 01:55 IST

शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत.

गोंदिया : शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ५८ कामे करण्याची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ८३० कामे पूर्ण झाली असून त्यावर २६ कोटी ९८ लाख ५५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. अजून ३१ कामे प्रगतिपथावर आहेत.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून माती नालाबांधची १८ कामे करायची होती ती करण्यात आली आहे. त्या कामावर ९६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. गॅबियन स्ट्रक्चरची ३४ कामे करायची होती ती कामे पुर्ण करण्यात आली. त्या कामावर १८ लाख ९५ हजार रूपये खर्च करण्यात आले. ६२ शेततळींची कामे करायची होती. त्यातील ६० कामे झाली असून दोन कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर ६२ लाख २० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. साखळी सिमेंट बंधाऱ्यांची ११४ कामे करायची होती. यातील ५२ कामे पुर्ण झाली आहेत. १४ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामावर आतापर्यत ४ कोटी ६९ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. सिमेंट बंधारा दुरूस्तीची आठ कामे मंजूर करण्यात आली, त्यातील एक काम पूर्ण झाले तर चार प्रगतिपथावर आहेत. तीन कामे नंतर सुरू करण्यात येणार आहेत. या कामांवर २४ लाख ९० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. नाला खोलीकरण व सरळीकरणाची २४ कामे मंजूर होऊन १५ कामे पूर्ण झाली आहेत. आठ कामे नंतर सुरू होणार आहेत. या कामांवर एक कोटी ८५ लाख ७८ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. ठिकठिकाणी असलेल्या गावतलावांमधून गाळ काढण्याची शासकीय १११ कामे मंजूर झाली असून ९९ कामे पूर्ण झाली आहेत. चार कामे प्रगतिपथावर आहेत तर आठ कामे बंद आहेत. या कामावर ३ कोटी ३१ लाख २४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. सलग समतल चराची चार कामे करायची होती. ती पूर्ण झाली आहेत. त्या कामावर १५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या मामा तलावांमधील पाण्याचा वापर करण्यासाठी त्यातील गाळ काढण्याची ६२ कामे सीएसआरअंतर्गत मंजूर झाली होती. त्यातील ४६ कामे पूर्ण झाली असून १६ कामे बंद आहेत. या कामावर २ कोटी ६४ लाख ४५ हजार रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ठिंबक सिंचनाची २३९ कामे मंजूर असून ती पुर्ण करण्यात आली. त्यावर ८३ लाख ७४ हजार रूपये खर्च करण्यात आले. तुषार सिंचनाची आठ कामे मंजूर झाली होती ती कामे १ लाख ८६ हजारातून पुर्ण करण्यात आली आहेत. दोन वनतलाव मंजूर झाले. त्यातील एक काम पूर्ण झाले असून दुसरे प्रगतिपथावर आहे. यासाठी ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या विविध कामांमुळे पाण्याची पातळी निश्चितपणे वाढेल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)