शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

तलावांच्या दुरूस्तीतून वाढेल सिंचन

By admin | Updated: November 29, 2014 23:22 IST

तलावांच्या या जिल्ह्यात असलेले १४०० मामा तलाव जिल्हावासीयांसाठी वरदान आहेत. त्यांचे खोलीकरण, गाळ उपसा केल्यास या तलावांमध्ये चांगला जलसाठा होऊन जमिनीतील पाण्याची पातळीही वाढेल.

गोंदिया : तलावांच्या या जिल्ह्यात असलेले १४०० मामा तलाव जिल्हावासीयांसाठी वरदान आहेत. त्यांचे खोलीकरण, गाळ उपसा केल्यास या तलावांमध्ये चांगला जलसाठा होऊन जमिनीतील पाण्याची पातळीही वाढेल. यातून बऱ्याच प्रमाणात सिंचनाचे क्षेत्र वाढून जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी व्यक्त केला.गेल्या साडेचार वर्षापासून जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. या कार्यकाळात जि.प.ने कोणकोणते उपक्रम, योजना राबविलेल्या आणि भविष्यासाठी काय योजना प्रस्तावित आहेत याबद्दल ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षण, आरोग्य, सिंचन, रस्ते, पाणी पुरवठा अशा सर्वच विषयांमध्ये उल्लेखनिय काम झाले आहे. त्याचे सकारात्मक बदलही त्या त्या क्षेत्रात पहायला मिळत आहे. आता १४०० मामा तलाव आणि लघु पाटबंधारे तलावांच्या दुरूस्ती व गाळ काढण्यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास सिंचनाच्या सोयी, जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास खूप मदत होईल. तलावांच्या दुरूस्तीसाठी निधी मिळण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याशिवाय राहिलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे, बंधाऱ्यांचा निधी खर्च करणे आणि नळ योजनेसाठी छोट्या गावांमध्ये सोलर पंपांसाठी निधी मिळविणे ही कामे पुढील काळात प्रस्तावित असल्याचेही शिवणकर यांनी सांगितले.आतापर्यंत सिंचन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल सांगताना ते म्हणाले, रोहयो अंतर्गत पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या विहिरी खोदून देण्यात आल्या. जवळपास ३५ कोटी रुपयांचे बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे सिंचनाच्या सोयीसोबत पाण्याची पातळीही वाढली आहे. रस्ते बांधकामासाठी वर्ष २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हा नियोजन समितीतून ३ कोटी तर राज्य शासनाकडून १५ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र अजूनही अनेक रस्त्यांचे काम बाकी आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने राबविलेल्या गावची शाळा आमची शाळा प्रकल्पाच्या माध्यमातून शाळांचा दर्जा बराच सुधारला आहे. वर्गखोल्यांचे बांधकामही मोठ्या प्रमाणात झाले आहे.