शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

विमा योजना तारक की मारक?

By admin | Updated: March 1, 2017 00:36 IST

जमिनीच्या सातबारावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यु, अपघातामुळे काही अवयव निकामी झाल्यास अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून

शेतकऱ्यांचे प्रस्ताव : फक्त तिघांनाच अनुदान, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अमरचंद ठवरे   अर्जुनी मोरगाव जमिनीच्या सातबारावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यु, अपघातामुळे काही अवयव निकामी झाल्यास अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याच्या हेतुने राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविल्या जात आहे. मात्र ही योजना तारक की मारक असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्त १७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आले. त्यामधून तिघांनाच अनुदान प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेली महत्वाकांक्षी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी तारक की मारक? असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या पश्चात वारसानाला दोन लाखाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत करण्यात आली आहे. नॅशनल इन्सुरेन्स कंपनी लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) दावा मंजूर झाल्यास दाव्याची रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यात जमा करते. दावा नामंजूर झाल्यास विमा कंपनी लाभधारक आणि तालुका कृषी अधिकारी यांना स्वतंत्रपणे पत्रव्यवहाराने कळविते, असे त्या प्रस्ताव प्रकरणात नमूद केले आहे. ज्या शेतकऱ्यांचा सात-बारा नोंदीमध्ये नावाचा उल्लेख आहे, अशा शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून दोन लाख, अपघातामुळे एक डोळा निकामी झाल्यास एक लाख, अपघातामुळे एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या कागजपत्रांची पूर्तता करून संबंधितांकडे पाठविण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले, त्यात खामखुरा येथील विलास महादेव मिसार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. बाराभाटी रस्ता अपघातातील ललराम मंगरू पंधरे मार्च २०१६, इटखेडा रस्ता अपघातातील सदाशिव दोडकू बुराडे (मार्च २०१६), अर्जुनी-मोरगाव येथील मुकुंदा शंभुजी शहारे याचा रस्ता अपघात मृत्यु (मे २०१६), चापटी येथील व्यंकट आदे (जून १६), अर्जुनी-मोरगाव येथील विठ्ठल कोहरे (जून १६), महागाव येथील विषबाधेने मृत्यू झालेले रमेश पिल्लेवान, सिरेगावचे रस्ता अपघाताने मृत झालेले श्रावण संग्रामे (जुलै १६), झाशीनगरचे मनोहर डोमळे (जुलै १६), परसोडी रैयत येथील ईश्वरदास मांदाळे (जुलै १६), अर्जुनी-मोरगावचे रत्नदीप उके (जुलै १६), मुंगली येथे वीज पडून मृत्युमुखी झालेल्या मंजुळा बाबुराव राऊत (आॅगस्ट १६), बोरटोला येथील साप चावून मृत्युमुखी झालेले विलास मेंढे (सप्टेंबर १६), गुरांचा गोठा पडून मृत्युमुखी झालेले झरपडा येथील शंकर मस्के (सप्टेंबर १६), मांडोखालचे ताराचंद शहारे (सप्टेंबर १६), झरपडा येथील विषबाधेने मृत्युमुखी झालेले शंकर रामा मस्के (डिसेंबर १६), नवेगावबांध येथील रेल्वेत मृत्युमुखी पडलेले घनशाम कापगते अशा १७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह पाठविण्यात आले होते. कुटुंबातील कमावता माणूस मृत्युमुखी पडल्यानंतर कुटूंबाची कशी वाताहात होते, हे त्या कुटूंबालाच कळते. वेळीच योजनेचा अनुदान मिळाला तर परिस्थिती सावरण्यास मदत होते. योजना जरी लोकहिताच्या असल्या तरी त्यांची फलश्रृती योजनेच्या अंमलबजावणीवर असते.