शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सावकारी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: August 26, 2015 01:50 IST

सावकारी पाशातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी प्रत्येक्षात अनेक शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे.

करडी (पालोरा) : सावकारी पाशातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी प्रत्येक्षात अनेक शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे. आजही शेतकरी कर्जात अडकलेले आहेत.राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांनी आपले कडील सोने तारण म्हणून सावकाराकडे गहाण ठेवून कर्ज घेतले असेल अशा शेतकऱ्याचे सावकारी कर्ज माफ करण्याचे निर्णय घेतले आहे. परंतू आजही अनेक शेतकऱ्यांनी परिसरातील जवळच्या सहकारी बँकाकडून आपल्याकडील सोने तारण ठेवून शेतीकरिता कर्ज घेतले अशा शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे. जगाचा पोशींदा असलेल्या बळीराजा केवळ सावकाराकडून कर्ज घेवून आत्महत्या करतो, ही बाब संवेदनशील मनाला हेलावून सोडणारी आहे. बळीराजाची सावकारी पाशातून सुटका करण्यसााठी राज्य शासनाने ठोस पावले उचलले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले असले तरी तेवढ्याच प्रमाणात इतर बँकाकडून सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे हे शासनाच्या व प्रतिनिधींच्या लक्षात येत नाही काय, सावकाराकडे सोने तारण ठेवून सावकाराकडून कर्ज घेतले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेशही निघाले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडे सोने तारण ठेवून कर्ज उचल केले आहे. अशा शेतकऱ्यांची अधीकृत नोंद त्या बँकेकडून घेतली नाही व शासनापर्यंत पोहचती केली नाही या धोकामुळे शेतकऱ्यांचा बळी जावू शकतो. शासनाने अनेक शेतकऱ्यावर अन्याय करून दिशाभूल केले जात आहे. आजघडीला सहकारी बँकेतून अनेक शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून शेतीकरिता कर्ज घेतलेला आहे. अशा शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष दिसत नाही. राज्यात अनेक बँकाकडून शेतकरी ७/१२ घेवून सोने तारण करून कर्ज घेत आहेत. अशा बँकेकडून शेतकऱ्याची माहिती घेवून सावकारी कर्जबरोबर बँकेकडून सोने तारण कर्जाची कर्जमाफी करण्यात यावी ही काळाची गरज आहे. तेव्हाच खरा बळीराजा सावकारी कर्जापासून मुक्त होईल, अशी मागणी पालोरा पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे, किरण भोयर आदिंनी केली आहे.(वार्ताहर)