अध्यक्षस्थानी भेंडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच काशीनाथ कापसे, ग्रा. पं. सदस्य दीपकर उके, प्रेमलाल नारनवरे, वनिता मेश्राम, पोलीस पाटील डाकराम मेंढे, युवनाथ मेश्राम, पृथ्वीराज भेंडारकर, लता मेंढे उपस्थित होते. तान्हा पोळ्याच्यानिमित्त समस्त गावकरी एकत्र यावे यासाठी स्वर्गीय चतरू भेंडारकर महाराजांनी सर्वप्रथम सन १९८२ मध्ये हनुमान मंदिरात हरीपाठ कार्यक्रमाचे आयोजन करून श्रावणमास समाप्तीनंतर तान्हा पोळ्याची परंपरा सुरू केली होती. तीच परंपरा कायम रहावी म्हणून लायकराम भेंडारकर यांनी वडिलांच्या त्या कार्याला कायम ठेवले आहे. याप्रसंगी बालगोपालांनी आणलेल्या नंदी बैलाचे पूजन करण्यात आले. ग्रामवासीयांनी भजन गावून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्यांना बक्षीस देण्यात आले. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
इंजोरीकरांनी जपली ४० वर्षंपासूनची तान्हा पोळ्याची परंपरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST