शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

धानपिकावर खोडकिडी अन् करपा रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2014 23:30 IST

धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा

काचेवानी : धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सद्यस्थितीत कृषी विभागाचा सल्ला घेण्याकरिता आणि कृषी विभागात आलेल्या योजनांची माहिती घेण्याकरिता कृषी विभागाच्या कार्यालयात दिवसभर शेकडो शेतकरी हजेरी लावत असल्याचे दिसून येते. तिरोडा तालुक्यात सर्वत्र खोडकिडी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी मिळत असल्याचे तिरोडा कृषी विभागाचे पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी सांगितले.सद्यस्थितीत शासनाकडून कृषी विभागाकडे कोणत्याही प्रकारच्या कीडनाशक आणि रोगनाशक औषधी पुरविण्यात आल्या नाहीत. औषधीची मागणी करण्यात आली आहे. त्या उपलब्ध होताच शेतकऱ्यांपर्यंत पुरविल्या जातील, असेही पर्यवेक्षक पारधी यांनी लोकमतला सांगितले आहे.खोडकिडी ही धान पिकांसाठी विनाशकारी असून नियंत्रणाकरिता फ्लोरोपायरीकॉस किंवा क्विनापफॉस २५ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी. या व्यतिरिक्त कारटॉप हायड्रोक्लोराईड पाच किलो किंवा परटेला पाच किलो प्रति एकर वापरावे. तसेच कडाकरपा आणि करपा रोगाकरिता कॉब्रेन्डेझिम कॉपर आॅक्झीक्लोराईड यात स्टेटरोसायक्लीन २५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी औषधांची गरज पडते. कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या औषधी स्वस्त दरात मिळत असल्याने सर्वसाधारण शेतकऱ्यांकरिता त्या महत्वाच्या असतात. मात्र कृषी विभागाकडून मिळणाऱ्या औषधी कधीही वेळेवर देण्यात येत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.तालुका कृषी विभागाने पीक लावणीच्या वेळी किंवा मे व जून महिन्यात संभावित कीड व रोगनाशक औषधीची मागणी केली असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती औषधी लागली असती. मात्र कृषी विभाग निष्काळजीपणा करुन उशीरा मागणी करीत असल्याने वेळेवर शेतकऱ्यांना औषधी पुरविली जात नाही.खासगी औषधी विक्रेते आणि कृषी विभागाचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग औषधांची मागणी उशीरा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी बाजारातून विकत घेण्याची पाळी आली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना दरिद्र बनवून व्यापारांचे हित जोपासत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांकरिता स्वस्त दरात औषधी उपलब्ध करुन देण्याची शेतकऱ्यांनी कृषी विभागाला मागणी केली आहे. (वार्ताहर)