शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकावर खोडकिडी अन् करपा रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2014 23:30 IST

धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा

काचेवानी : धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सद्यस्थितीत कृषी विभागाचा सल्ला घेण्याकरिता आणि कृषी विभागात आलेल्या योजनांची माहिती घेण्याकरिता कृषी विभागाच्या कार्यालयात दिवसभर शेकडो शेतकरी हजेरी लावत असल्याचे दिसून येते. तिरोडा तालुक्यात सर्वत्र खोडकिडी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी मिळत असल्याचे तिरोडा कृषी विभागाचे पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी सांगितले.सद्यस्थितीत शासनाकडून कृषी विभागाकडे कोणत्याही प्रकारच्या कीडनाशक आणि रोगनाशक औषधी पुरविण्यात आल्या नाहीत. औषधीची मागणी करण्यात आली आहे. त्या उपलब्ध होताच शेतकऱ्यांपर्यंत पुरविल्या जातील, असेही पर्यवेक्षक पारधी यांनी लोकमतला सांगितले आहे.खोडकिडी ही धान पिकांसाठी विनाशकारी असून नियंत्रणाकरिता फ्लोरोपायरीकॉस किंवा क्विनापफॉस २५ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी. या व्यतिरिक्त कारटॉप हायड्रोक्लोराईड पाच किलो किंवा परटेला पाच किलो प्रति एकर वापरावे. तसेच कडाकरपा आणि करपा रोगाकरिता कॉब्रेन्डेझिम कॉपर आॅक्झीक्लोराईड यात स्टेटरोसायक्लीन २५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी औषधांची गरज पडते. कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या औषधी स्वस्त दरात मिळत असल्याने सर्वसाधारण शेतकऱ्यांकरिता त्या महत्वाच्या असतात. मात्र कृषी विभागाकडून मिळणाऱ्या औषधी कधीही वेळेवर देण्यात येत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.तालुका कृषी विभागाने पीक लावणीच्या वेळी किंवा मे व जून महिन्यात संभावित कीड व रोगनाशक औषधीची मागणी केली असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती औषधी लागली असती. मात्र कृषी विभाग निष्काळजीपणा करुन उशीरा मागणी करीत असल्याने वेळेवर शेतकऱ्यांना औषधी पुरविली जात नाही.खासगी औषधी विक्रेते आणि कृषी विभागाचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग औषधांची मागणी उशीरा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी बाजारातून विकत घेण्याची पाळी आली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना दरिद्र बनवून व्यापारांचे हित जोपासत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांकरिता स्वस्त दरात औषधी उपलब्ध करुन देण्याची शेतकऱ्यांनी कृषी विभागाला मागणी केली आहे. (वार्ताहर)