शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

धानपिकावर खोडकिडी अन् करपा रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2014 23:30 IST

धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा

काचेवानी : धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सद्यस्थितीत कृषी विभागाचा सल्ला घेण्याकरिता आणि कृषी विभागात आलेल्या योजनांची माहिती घेण्याकरिता कृषी विभागाच्या कार्यालयात दिवसभर शेकडो शेतकरी हजेरी लावत असल्याचे दिसून येते. तिरोडा तालुक्यात सर्वत्र खोडकिडी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी मिळत असल्याचे तिरोडा कृषी विभागाचे पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी सांगितले.सद्यस्थितीत शासनाकडून कृषी विभागाकडे कोणत्याही प्रकारच्या कीडनाशक आणि रोगनाशक औषधी पुरविण्यात आल्या नाहीत. औषधीची मागणी करण्यात आली आहे. त्या उपलब्ध होताच शेतकऱ्यांपर्यंत पुरविल्या जातील, असेही पर्यवेक्षक पारधी यांनी लोकमतला सांगितले आहे.खोडकिडी ही धान पिकांसाठी विनाशकारी असून नियंत्रणाकरिता फ्लोरोपायरीकॉस किंवा क्विनापफॉस २५ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी. या व्यतिरिक्त कारटॉप हायड्रोक्लोराईड पाच किलो किंवा परटेला पाच किलो प्रति एकर वापरावे. तसेच कडाकरपा आणि करपा रोगाकरिता कॉब्रेन्डेझिम कॉपर आॅक्झीक्लोराईड यात स्टेटरोसायक्लीन २५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी औषधांची गरज पडते. कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या औषधी स्वस्त दरात मिळत असल्याने सर्वसाधारण शेतकऱ्यांकरिता त्या महत्वाच्या असतात. मात्र कृषी विभागाकडून मिळणाऱ्या औषधी कधीही वेळेवर देण्यात येत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.तालुका कृषी विभागाने पीक लावणीच्या वेळी किंवा मे व जून महिन्यात संभावित कीड व रोगनाशक औषधीची मागणी केली असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती औषधी लागली असती. मात्र कृषी विभाग निष्काळजीपणा करुन उशीरा मागणी करीत असल्याने वेळेवर शेतकऱ्यांना औषधी पुरविली जात नाही.खासगी औषधी विक्रेते आणि कृषी विभागाचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग औषधांची मागणी उशीरा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी बाजारातून विकत घेण्याची पाळी आली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना दरिद्र बनवून व्यापारांचे हित जोपासत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांकरिता स्वस्त दरात औषधी उपलब्ध करुन देण्याची शेतकऱ्यांनी कृषी विभागाला मागणी केली आहे. (वार्ताहर)