शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

संसर्ग येतोय आटोक्यात; पण मृत्यूचे सत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत आली आहे. रुग्णसंख्येत दररोज घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्या ...

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत आली आहे. रुग्णसंख्येत दररोज घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून, ती आता ६३४वर आली आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्हावासीयांची थोडी चिंता कायम आहे.

एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर प्रचंड असल्याने मे महिन्यात काय स्थिती राहणार अशी चिंता जिल्हावासीयांना सतावत होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचे मीटर डाऊन असल्याने कोरोनाबाधितांची संख्या बरीच कमी झाली, तर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून, दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी १२५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच कोराेनाबाधितांचा उपचारादरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,५८,४४८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,३३,४२८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,५४,०१३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,३३,२०७ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,४५६ कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६३४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३८४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

..................

राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी दर ५ टक्क्यांनी जास्त

कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याच्या रिकव्हरी दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा रिकव्हरी दर ९६.७५ टक्के आहे, तर राज्याचा रिकव्हरी दर ९२.७६ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी दर राज्यापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे.

......

दोन लाख ३३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ३३ हजार ७९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व १४० लसीकरण केंद्रावरून लसीकरण केले जात आहे.