शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

संसर्ग येतोय आटोक्यात; पण मृत्यूचे सत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत आली आहे. रुग्णसंख्येत दररोज घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्या ...

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत आली आहे. रुग्णसंख्येत दररोज घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून, ती आता ६३४वर आली आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्हावासीयांची थोडी चिंता कायम आहे.

एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर प्रचंड असल्याने मे महिन्यात काय स्थिती राहणार अशी चिंता जिल्हावासीयांना सतावत होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचे मीटर डाऊन असल्याने कोरोनाबाधितांची संख्या बरीच कमी झाली, तर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून, दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी १२५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच कोराेनाबाधितांचा उपचारादरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,५८,४४८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,३३,४२८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,५४,०१३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,३३,२०७ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,४५६ कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६३४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३८४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

..................

राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी दर ५ टक्क्यांनी जास्त

कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याच्या रिकव्हरी दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा रिकव्हरी दर ९६.७५ टक्के आहे, तर राज्याचा रिकव्हरी दर ९२.७६ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी दर राज्यापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे.

......

दोन लाख ३३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ३३ हजार ७९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व १४० लसीकरण केंद्रावरून लसीकरण केले जात आहे.