शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

संसर्ग येतोय आटोक्यात; पण मृत्यूचे सत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत आली आहे. रुग्णसंख्येत दररोज घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्या ...

गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत आली आहे. रुग्णसंख्येत दररोज घट होत असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून, ती आता ६३४वर आली आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने जिल्हावासीयांची थोडी चिंता कायम आहे.

एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर प्रचंड असल्याने मे महिन्यात काय स्थिती राहणार अशी चिंता जिल्हावासीयांना सतावत होती. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचे मीटर डाऊन असल्याने कोरोनाबाधितांची संख्या बरीच कमी झाली, तर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून, दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी १२५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच कोराेनाबाधितांचा उपचारादरम्यान खासगी व शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,५८,४४८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,३३,४२८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,५४,०१३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,३३,२०७ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,४५६ कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६३४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३८४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

..................

राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी दर ५ टक्क्यांनी जास्त

कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याच्या रिकव्हरी दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,१४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा रिकव्हरी दर ९६.७५ टक्के आहे, तर राज्याचा रिकव्हरी दर ९२.७६ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी दर राज्यापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे.

......

दोन लाख ३३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ३३ हजार ७९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व १४० लसीकरण केंद्रावरून लसीकरण केले जात आहे.