शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ

By admin | Updated: February 19, 2015 01:09 IST

ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग, मोठयÞा प्रमाणात होणारी वृक्ष कटाई, वाहनांच्या संख्येत...

गोंदिया : ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग, मोठयÞा प्रमाणात होणारी वृक्ष कटाई, वाहनांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात अस्वच्छता राहते.हे प्रदूषणात मोठयÞा प्रमाणात वाढ होण्यामागील मुख्य कारण आहे.गावातील नाल्यांमध्ये साचलेला केरकचरा, सांडपाणी, पिण्याचे पाणी, दूषित पाणी यामुळेही प्रदूषणात वाढ होऊन याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन नवनवीन आजाराची निर्मिती होत आहे.यामुळे शासन, प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध विभागाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शोधमोहीम सुरूकरावी. तसेच प्रदूषणास कारणीभूत व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील नाली व हँडपंपच्या भोवताल सांडपाणी जमा होते त्या हँडपंपचा पाणी उपयोगात आणल्यास हागवण, पोटाचे विकार उद्भवतात. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे हवेत प्रदूषण होऊन श्वसनाचे विकार वाढतात.विविध कार्यक्रमांमध्ये स्पीकर, डी.जे., साऊंड सिस्टम अशा ध्वनिक्षेपकाचा आवाज वाजवीपेक्षा जास्त असल्यामुळे व अशा आवाजाच्या सतत सानिध्यात राहिल्याने त्याचा परिणाम थेट हृदयावर होत आहे.त्याप्रमाणे कानावरही परिणाम होऊन कायमस्वरु पी बिहरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा प्रदूषणाबाबत सर्वत्र जनजागृती मोहिमेचे आयोजन करणे आवश्यक आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या सर्वाधिक समस्या उद्भवत आहेत.वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक, दूषित पदार्थाचे मिश्रम होत आहे.डीझेल, पेट्रोल, इतर इंधन, सिगारेट या माध्यमातून कार्बन मोनोक्सिड (रंगहीन वायू) बाहेर पडतो त्यामुळे या वायुमुळे प्रदूषण जास्त होताना दिसते. या अपायकारक वायूचे प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे.त्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. नागरिकांना अनेक शारीरिक समस्या जाणवत आहे. (तालुका प्रतिनिधी)