शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ

By admin | Updated: February 19, 2015 01:09 IST

ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग, मोठयÞा प्रमाणात होणारी वृक्ष कटाई, वाहनांच्या संख्येत...

गोंदिया : ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग, मोठयÞा प्रमाणात होणारी वृक्ष कटाई, वाहनांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात अस्वच्छता राहते.हे प्रदूषणात मोठयÞा प्रमाणात वाढ होण्यामागील मुख्य कारण आहे.गावातील नाल्यांमध्ये साचलेला केरकचरा, सांडपाणी, पिण्याचे पाणी, दूषित पाणी यामुळेही प्रदूषणात वाढ होऊन याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन नवनवीन आजाराची निर्मिती होत आहे.यामुळे शासन, प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध विभागाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शोधमोहीम सुरूकरावी. तसेच प्रदूषणास कारणीभूत व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील नाली व हँडपंपच्या भोवताल सांडपाणी जमा होते त्या हँडपंपचा पाणी उपयोगात आणल्यास हागवण, पोटाचे विकार उद्भवतात. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे हवेत प्रदूषण होऊन श्वसनाचे विकार वाढतात.विविध कार्यक्रमांमध्ये स्पीकर, डी.जे., साऊंड सिस्टम अशा ध्वनिक्षेपकाचा आवाज वाजवीपेक्षा जास्त असल्यामुळे व अशा आवाजाच्या सतत सानिध्यात राहिल्याने त्याचा परिणाम थेट हृदयावर होत आहे.त्याप्रमाणे कानावरही परिणाम होऊन कायमस्वरु पी बिहरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा प्रदूषणाबाबत सर्वत्र जनजागृती मोहिमेचे आयोजन करणे आवश्यक आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या सर्वाधिक समस्या उद्भवत आहेत.वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक, दूषित पदार्थाचे मिश्रम होत आहे.डीझेल, पेट्रोल, इतर इंधन, सिगारेट या माध्यमातून कार्बन मोनोक्सिड (रंगहीन वायू) बाहेर पडतो त्यामुळे या वायुमुळे प्रदूषण जास्त होताना दिसते. या अपायकारक वायूचे प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे.त्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. नागरिकांना अनेक शारीरिक समस्या जाणवत आहे. (तालुका प्रतिनिधी)