शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

आवत्यांच्या क्षेत्रात यंदा वाढ

By admin | Updated: July 29, 2015 01:27 IST

तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरविली व आता उन्ह तापू लागली. मात्र पुरेशे पाणी शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरूच ठेवली आहेत.

गोंदिया : तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरविली व आता उन्ह तापू लागली. मात्र पुरेशे पाणी शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरूच ठेवली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात धानपिकाची एकूण रोवणी ३७ टक्के झाली आहे. यात प्रत्यक्ष रोवणीचे प्रमाण ३२ टक्के असून आवत्यांचे प्रमाण १३० टक्के असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षी पावसाने वेळोवेळी साथ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे नुकसान सहन करण्याची पाळी आली नव्हती. मात्र यंदा सतत तीन-चार दिवस पाऊस येतो, नंतर वातावरण खुले होते. यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी धाडसाने रोवणीच्या कामात गुंतले आहेत. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका करण्यात आली असून याची टक्केवारी १०६ आहे. तर रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७४ हजार ९३५ हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी ५५ हजार २३५ हेक्टरमध्ये करण्यात आली असून याची टक्केवारी ३२ आहे. तसेच आवत्यांचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ९६५ हेक्टर असून प्रत्यक्ष आवत्या १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये करण्यात आल्याने यंदा आवत्यांचे क्षेत्र वाढून याची टक्केवारी १३० वर पोहोचली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण रोवणीचे (आवत्या व रोवणी) सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी आतापर्यंत केवळ ६८ हजार १७० हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. याची टक्केवारी ३७ टक्के आहे.याशिवाय जिल्ह्यात काही प्रमाणात तृणधान्य, कडधान्य व गळीताचे धान्य लावण्यात आले आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दुबार पेरणीची गरज नाहीकाही दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या होत्या. त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उद्भवण्याची दाट शक्यता होती. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या होत्या. मात्र यानंतर आठवडाभर संततधार पाऊस आल्याने रोपवाटिकांना जीवदान मिळाले. लगेच काही शेतकऱ्यांनी थांबलेल्या रोवणीच्या कामांना सुरूवात केली. आता पुरेसा पाणी शेतात आहे. तसेच काही शेतात ओलावा असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट नसल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी नुकसान नाहीजिल्हा कृषी कार्यालयात मागील वर्षी नैसर्गिक संकटामुळे शेतपिकांच्या नुकसानीची व नुकसान भरपाईबाबत विचारणा केल्यावर, मागील वर्षी अशाप्रकारच्या नुकसानीची नोंदच नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.