शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

आवत्यांच्या क्षेत्रात यंदा वाढ

By admin | Updated: July 29, 2015 01:27 IST

तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरविली व आता उन्ह तापू लागली. मात्र पुरेशे पाणी शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरूच ठेवली आहेत.

गोंदिया : तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरविली व आता उन्ह तापू लागली. मात्र पुरेशे पाणी शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरूच ठेवली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात धानपिकाची एकूण रोवणी ३७ टक्के झाली आहे. यात प्रत्यक्ष रोवणीचे प्रमाण ३२ टक्के असून आवत्यांचे प्रमाण १३० टक्के असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षी पावसाने वेळोवेळी साथ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे नुकसान सहन करण्याची पाळी आली नव्हती. मात्र यंदा सतत तीन-चार दिवस पाऊस येतो, नंतर वातावरण खुले होते. यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी धाडसाने रोवणीच्या कामात गुंतले आहेत. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका करण्यात आली असून याची टक्केवारी १०६ आहे. तर रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७४ हजार ९३५ हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी ५५ हजार २३५ हेक्टरमध्ये करण्यात आली असून याची टक्केवारी ३२ आहे. तसेच आवत्यांचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ९६५ हेक्टर असून प्रत्यक्ष आवत्या १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये करण्यात आल्याने यंदा आवत्यांचे क्षेत्र वाढून याची टक्केवारी १३० वर पोहोचली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण रोवणीचे (आवत्या व रोवणी) सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी आतापर्यंत केवळ ६८ हजार १७० हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. याची टक्केवारी ३७ टक्के आहे.याशिवाय जिल्ह्यात काही प्रमाणात तृणधान्य, कडधान्य व गळीताचे धान्य लावण्यात आले आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दुबार पेरणीची गरज नाहीकाही दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या होत्या. त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उद्भवण्याची दाट शक्यता होती. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या होत्या. मात्र यानंतर आठवडाभर संततधार पाऊस आल्याने रोपवाटिकांना जीवदान मिळाले. लगेच काही शेतकऱ्यांनी थांबलेल्या रोवणीच्या कामांना सुरूवात केली. आता पुरेसा पाणी शेतात आहे. तसेच काही शेतात ओलावा असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट नसल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी नुकसान नाहीजिल्हा कृषी कार्यालयात मागील वर्षी नैसर्गिक संकटामुळे शेतपिकांच्या नुकसानीची व नुकसान भरपाईबाबत विचारणा केल्यावर, मागील वर्षी अशाप्रकारच्या नुकसानीची नोंदच नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.