शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आवत्यांच्या क्षेत्रात यंदा वाढ

By admin | Updated: July 29, 2015 01:27 IST

तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरविली व आता उन्ह तापू लागली. मात्र पुरेशे पाणी शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरूच ठेवली आहेत.

गोंदिया : तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरविली व आता उन्ह तापू लागली. मात्र पुरेशे पाणी शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरूच ठेवली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात धानपिकाची एकूण रोवणी ३७ टक्के झाली आहे. यात प्रत्यक्ष रोवणीचे प्रमाण ३२ टक्के असून आवत्यांचे प्रमाण १३० टक्के असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षी पावसाने वेळोवेळी साथ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे नुकसान सहन करण्याची पाळी आली नव्हती. मात्र यंदा सतत तीन-चार दिवस पाऊस येतो, नंतर वातावरण खुले होते. यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी धाडसाने रोवणीच्या कामात गुंतले आहेत. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका करण्यात आली असून याची टक्केवारी १०६ आहे. तर रोवणीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७४ हजार ९३५ हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी ५५ हजार २३५ हेक्टरमध्ये करण्यात आली असून याची टक्केवारी ३२ आहे. तसेच आवत्यांचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ हजार ९६५ हेक्टर असून प्रत्यक्ष आवत्या १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये करण्यात आल्याने यंदा आवत्यांचे क्षेत्र वाढून याची टक्केवारी १३० वर पोहोचली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण रोवणीचे (आवत्या व रोवणी) सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून प्रत्यक्ष रोवणी आतापर्यंत केवळ ६८ हजार १७० हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. याची टक्केवारी ३७ टक्के आहे.याशिवाय जिल्ह्यात काही प्रमाणात तृणधान्य, कडधान्य व गळीताचे धान्य लावण्यात आले आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दुबार पेरणीची गरज नाहीकाही दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या होत्या. त्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उद्भवण्याची दाट शक्यता होती. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या होत्या. मात्र यानंतर आठवडाभर संततधार पाऊस आल्याने रोपवाटिकांना जीवदान मिळाले. लगेच काही शेतकऱ्यांनी थांबलेल्या रोवणीच्या कामांना सुरूवात केली. आता पुरेसा पाणी शेतात आहे. तसेच काही शेतात ओलावा असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट नसल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी नुकसान नाहीजिल्हा कृषी कार्यालयात मागील वर्षी नैसर्गिक संकटामुळे शेतपिकांच्या नुकसानीची व नुकसान भरपाईबाबत विचारणा केल्यावर, मागील वर्षी अशाप्रकारच्या नुकसानीची नोंदच नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.