शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

६० घटनांत कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

By admin | Updated: June 15, 2016 02:18 IST

वर्ष २०१६ काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही ठरले आहे. या वर्षातील गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात आगीच्या ६० घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे.

साडेपाच महिन्यातील आगी : ३३ घटना शहराबाहेरीलकपिल केकत गोंदियावर्ष २०१६ काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही ठरले आहे. या वर्षातील गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात आगीच्या ६० घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. या यात कित्येकांची रोजीरोटी हिरावल्या गेली तर अनेकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले आहे. यातील काही घटनांतील नुकसानीची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही सुमारे दोन कोटींच्या वर मालमत्ता जळून खाक झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने घेतली आहे. आग, पाणी आणि हवा या तत्वांपेक्षा शक्तिशाली कुणीही नाही. त्यामुळेच या तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आग जाळून खाक करते. पाणी बुडवून टाकते, तर हवा आपल्या पाशात घेऊन उडवून टाकते. या तत्वांपासून कितीही सावधानता बाळगली तरीही या तत्वांच्या तडाख्यापासून कुणीही बचावू शकलेला नाही. याची प्रचिती विविध घटनांच्या माध्यमातून येत राहते. यात सन २०१६ च्या सुरूवातीच्या साडेपाच महिन्यांत आगीच्या ६० घटना घडल्या आहेत. या घटनांवर आळा बसविण्यासाठी गोंदियात अग्निशमन कार्यालय असून येथूनच जिल्ह्यात सेवा दिली जाते. या ६० घटनांतील ३३ घटना शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. त्यात घर, दुकान, टपऱ्यांसोबत उद्योगांनाही आगी लागल्याची नोंद आहे. मात्र त्यात घरे जळण्याच्या घटना जास्त असल्याने अग्नितांडवात कित्येकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले, तर कित्येकांची रोजीरोटी भस्मसात झाली आहे. साडेपाच महिन्यांत घडलेल्या या घटनांमध्ये गोरेगाव तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथील राईस मीलमध्ये आग लागल्याची सर्वात मोठी घटना घडली आहे. ६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याची नोंद आहे.