शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले, मग आता खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून खरेदीला सुरुवात झाल्याचे भासविले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही धान ...

गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून खरेदीला सुरुवात झाल्याचे भासविले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे केंद्राचे उद्घाटन केले, मग आता प्रत्यक्षात धान खरेदीला सुरुवात करून शेतकऱ्यांची कोंडी सोडवा, अशी मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, रब्बीतील धान खरेदीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. जिल्ह्यात केवळ धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नाही, तर मागील खरीप हंगामात विक्री केलेल्या धानाचे बोनस अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची अद्यापही मिलिंग सुरू झालेली नाही. त्यामुळे हा धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण केवळ धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केल्याचे दाखवून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रब्बीतील धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र, नोंदणी केल्यानंतर देखील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे पहिल्यांदाच रब्बीतील धान खरेदी खरीप हंगामाला सुरुवात होऊन देखील सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट असून, खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही नेते केवळ वृत्तपत्रात स्वत:चे छायाचित्र छापून घेऊन श्रेय लाटत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणीकडे त्यांचे कुठलेच लक्ष नसल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे. याच विषयाला घेऊन माजी आ. अग्रवाल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच रब्बी धान खरेदीला त्वरित सुरुवात करण्याची मागणी केली.

............

भाजप छेडणार आंदोलन

रब्बी हंगामातील धान खरेदीला अद्यापही प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. धानाचे बोनस मिळाले नाही. रब्बी धान विक्रीसाठी नोंदणी करूनसुद्धा धान खरेदी केली जात नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्हा प्रशासनाने रब्बीतील धान खरेदीला त्वरित सुरुवात न केल्यास भाजपच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिला आहे.