शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले, मग आता खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून खरेदीला सुरुवात झाल्याचे भासविले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही धान ...

गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून खरेदीला सुरुवात झाल्याचे भासविले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे केंद्राचे उद्घाटन केले, मग आता प्रत्यक्षात धान खरेदीला सुरुवात करून शेतकऱ्यांची कोंडी सोडवा, अशी मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, रब्बीतील धान खरेदीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. जिल्ह्यात केवळ धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नाही, तर मागील खरीप हंगामात विक्री केलेल्या धानाचे बोनस अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची अद्यापही मिलिंग सुरू झालेली नाही. त्यामुळे हा धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण केवळ धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केल्याचे दाखवून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रब्बीतील धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र, नोंदणी केल्यानंतर देखील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे पहिल्यांदाच रब्बीतील धान खरेदी खरीप हंगामाला सुरुवात होऊन देखील सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट असून, खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही नेते केवळ वृत्तपत्रात स्वत:चे छायाचित्र छापून घेऊन श्रेय लाटत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणीकडे त्यांचे कुठलेच लक्ष नसल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे. याच विषयाला घेऊन माजी आ. अग्रवाल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच रब्बी धान खरेदीला त्वरित सुरुवात करण्याची मागणी केली.

............

भाजप छेडणार आंदोलन

रब्बी हंगामातील धान खरेदीला अद्यापही प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. धानाचे बोनस मिळाले नाही. रब्बी धान विक्रीसाठी नोंदणी करूनसुद्धा धान खरेदी केली जात नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्हा प्रशासनाने रब्बीतील धान खरेदीला त्वरित सुरुवात न केल्यास भाजपच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिला आहे.