शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अपूर्ण कालव्यांमुळे सिंचनाला फटका

By admin | Updated: December 15, 2014 22:57 IST

गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील

५० टक्केच काम : शेतीला पाणी मिळणे झाले दुरापास्तसालेकसा : गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकल्पाला कार्यान्वित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु कालव्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय या प्रकल्पाचे काही औचित्य नाही. कालव्यांशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कधीही पोहोचू शकत नाही. बेवारटोला जलाशयाचे मुख्य दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याचे काम केवळ ४ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. मुंशीटोला (दलदलकुही) पर्यंतच हे काम करण्यात आले आहे. हा कालवा आतासुद्धा तुटक्याफुटल्या व अपूर्ण बांधकाम झालेल्या स्थितीत आहे. तरीसुद्धा या कालव्यातून जवळपास २०० एकर शेतजमिनीस सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.उजव्या कालव्याचे काम चांदसूरज गावापर्यंत करण्यात आले आहे. यानंतरही याचे काम अपूर्णच आहे. या ठिकाणापर्यंत कालव्यासाठी जमीन खोदून अपूर्ण ठेवण्यात आले आहे. चांदसूरजच्या पुढे कालवा नेण्यासाठी रेल्वे लाईनच्या खाली अंडरग्राऊंड खोदकाम करावे लागणार आहे.चांदसूरजच्या पुढे विचारपूर, ढुबरूटोला, कोपालगड, दल्लीटोला, मुरझाटोला, जमाकुडो, भर्रीटोला, ुतुरमुळीटोलापर्यंत हा कालवा जाणार आहे. या कालव्याचे जवळपास १० ते १२ किमी लांब काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही. कालव्याच्या कामाचे सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही.जवळपास १५ वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात या प्रकल्पाच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाचा खर्च केवळ नऊ कोटी रूपये होती. परंतु आता याची किंमत ६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रकल्पाला जर पूर्ण करण्यात आले तर केपीटोला (पिपरिया) येथील कुआढास प्रकल्पालासुद्धा नवसंजीवनी मिळू शकेल. कुआढास प्रकल्पापासून जवळपास एक हजार हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकेल.बेवारटोला प्रकल्पापासून दर्रेकसा, जमाकुडो व टोयागोंदी पंचायतीच्या जवळपास एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)