शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कालव्यांमुळे सिंचनाला फटका

By admin | Updated: December 15, 2014 22:57 IST

गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील

५० टक्केच काम : शेतीला पाणी मिळणे झाले दुरापास्तसालेकसा : गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकल्पाला कार्यान्वित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु कालव्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय या प्रकल्पाचे काही औचित्य नाही. कालव्यांशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कधीही पोहोचू शकत नाही. बेवारटोला जलाशयाचे मुख्य दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याचे काम केवळ ४ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. मुंशीटोला (दलदलकुही) पर्यंतच हे काम करण्यात आले आहे. हा कालवा आतासुद्धा तुटक्याफुटल्या व अपूर्ण बांधकाम झालेल्या स्थितीत आहे. तरीसुद्धा या कालव्यातून जवळपास २०० एकर शेतजमिनीस सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.उजव्या कालव्याचे काम चांदसूरज गावापर्यंत करण्यात आले आहे. यानंतरही याचे काम अपूर्णच आहे. या ठिकाणापर्यंत कालव्यासाठी जमीन खोदून अपूर्ण ठेवण्यात आले आहे. चांदसूरजच्या पुढे कालवा नेण्यासाठी रेल्वे लाईनच्या खाली अंडरग्राऊंड खोदकाम करावे लागणार आहे.चांदसूरजच्या पुढे विचारपूर, ढुबरूटोला, कोपालगड, दल्लीटोला, मुरझाटोला, जमाकुडो, भर्रीटोला, ुतुरमुळीटोलापर्यंत हा कालवा जाणार आहे. या कालव्याचे जवळपास १० ते १२ किमी लांब काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही. कालव्याच्या कामाचे सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही.जवळपास १५ वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात या प्रकल्पाच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाचा खर्च केवळ नऊ कोटी रूपये होती. परंतु आता याची किंमत ६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रकल्पाला जर पूर्ण करण्यात आले तर केपीटोला (पिपरिया) येथील कुआढास प्रकल्पालासुद्धा नवसंजीवनी मिळू शकेल. कुआढास प्रकल्पापासून जवळपास एक हजार हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकेल.बेवारटोला प्रकल्पापासून दर्रेकसा, जमाकुडो व टोयागोंदी पंचायतीच्या जवळपास एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)