शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

अपूर्ण कालव्यांमुळे सिंचनाला फटका

By admin | Updated: December 15, 2014 22:57 IST

गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील

५० टक्केच काम : शेतीला पाणी मिळणे झाले दुरापास्तसालेकसा : गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकल्पाला कार्यान्वित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु कालव्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय या प्रकल्पाचे काही औचित्य नाही. कालव्यांशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कधीही पोहोचू शकत नाही. बेवारटोला जलाशयाचे मुख्य दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याचे काम केवळ ४ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. मुंशीटोला (दलदलकुही) पर्यंतच हे काम करण्यात आले आहे. हा कालवा आतासुद्धा तुटक्याफुटल्या व अपूर्ण बांधकाम झालेल्या स्थितीत आहे. तरीसुद्धा या कालव्यातून जवळपास २०० एकर शेतजमिनीस सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.उजव्या कालव्याचे काम चांदसूरज गावापर्यंत करण्यात आले आहे. यानंतरही याचे काम अपूर्णच आहे. या ठिकाणापर्यंत कालव्यासाठी जमीन खोदून अपूर्ण ठेवण्यात आले आहे. चांदसूरजच्या पुढे कालवा नेण्यासाठी रेल्वे लाईनच्या खाली अंडरग्राऊंड खोदकाम करावे लागणार आहे.चांदसूरजच्या पुढे विचारपूर, ढुबरूटोला, कोपालगड, दल्लीटोला, मुरझाटोला, जमाकुडो, भर्रीटोला, ुतुरमुळीटोलापर्यंत हा कालवा जाणार आहे. या कालव्याचे जवळपास १० ते १२ किमी लांब काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही. कालव्याच्या कामाचे सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही.जवळपास १५ वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात या प्रकल्पाच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाचा खर्च केवळ नऊ कोटी रूपये होती. परंतु आता याची किंमत ६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रकल्पाला जर पूर्ण करण्यात आले तर केपीटोला (पिपरिया) येथील कुआढास प्रकल्पालासुद्धा नवसंजीवनी मिळू शकेल. कुआढास प्रकल्पापासून जवळपास एक हजार हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकेल.बेवारटोला प्रकल्पापासून दर्रेकसा, जमाकुडो व टोयागोंदी पंचायतीच्या जवळपास एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)