शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST

तिरोडा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमाने घातले आहे. अशात लॉकडाऊनमुळे उद्याेगधंदे सर्वच बंद आहेत. शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. ...

तिरोडा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमाने घातले आहे. अशात लॉकडाऊनमुळे उद्याेगधंदे सर्वच बंद आहेत. शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी माजी आ.विजय रहांगडाले यांनी केली आहे.

सद्यस्थितीत राज्यात कोविड १९ची दुसरी लाट सुरू असून, परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कडक लॉकडाऊनचे निर्देश दिले आहेत. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवरच आधारित आहे. या दोन्ही जिल्ह्यांत धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केले आहे. शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति ५० क्विंटलपर्यंत ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, धानाची विक्री करून चार महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्यापही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली असून, शेतकऱ्यांना त्वरित बोनस मिळाल्यास काेविड काळात आर्थिक कोंडी सोडविण्यास मदत होईल. त्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करावी, अशी मागणी आ.विजय रहांगडाले यांनी केली आहे.