शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रब्बीतील धान खरेदी करून बोनस तत्काळ जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

गोंदिया : खरीप हंगाम आता तोंडावर आला असून कधीही पाऊस बरसण्याची शक्यता आहे. असे असतानाही अद्याप रब्बीतील धानाची खरेदी ...

गोंदिया : खरीप हंगाम आता तोंडावर आला असून कधीही पाऊस बरसण्याची शक्यता आहे. असे असतानाही अद्याप रब्बीतील धानाची खरेदी झालेली नाही. शिवाय खरिपातील बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. आता खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असून रब्बीतील धानाची खरेदी सुरू करून बोनसची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली आहे.

या भेटीत अग्रवाल यांनी, जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टर शेतीतून जवळपास ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न झाले आहे. मात्र जिल्ह्यातील गोदामांची धान साठवण क्षमता ४ ते ५ लाख क्विंटलचीच असल्याने खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे, हा प्रश्न समोर आहे. त्याच सोबत अद्याप संपूर्ण धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. यामुळेसुद्धा शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होईल आणि शेतीची कामे करायला बळीराजा शेतात जाईल. मात्र घरात असलेले धान विकले गेले नाही तर नवीन धान पिकवून ठेवायचे कुठे? सोबतच कर्जाचे हप्ते कुठून फेडायचे, असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे.

शिवाय, विमा कंपनीदेखील योग्य तसा प्रतिसाद शेतकऱ्यांना देत नाही. करिता रब्बीतील धानाची खरेदी सुरू करून शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस त्वरित जमा करावा, अशी मागणी केली. यावर ना. भुजबळ यांनी, लवकरच यावर तोडगा निघेल असा आशावाद व्यक्त केला.

-----------------------------------

धान खरेदीबाबत सरकारी धोरण उदासीन

याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, शेतकऱ्यांची धान खरेदी करा यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला. धान खरेदीसाठी येणाऱ्या समस्यादेखील शासनाच्या लक्षात आणून दिल्या. धानाचे मिलिंग न झाल्यामुळे खरेदीवर परिणाम होईल, असे लक्षात आणून दिल्यावरसुद्धा जर धान खरेदी खोळंबली असेल तर याला शासनाचे धोरण जबाबदार आहे, असे ना. भुजबळ यांच्या लक्षात आणून दिले. तसेच यासाठी धान खरेदीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. धान खरेदी ही दरवर्षी पार पडणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे एकसारख्या समस्या दरवर्षी उद्भवत असतील तर याला प्रशासन जबाबदार आहे. धान खरेदीसाठी बारदाना व जागा लागते. अशा सर्व बाबींचे नियोजन आधीच केले तर शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. सोबतच प्रशासनावर ताणदेखील येणार नाही. तसेच अवकाळी पावसामुळे खराब होणारे धानसुद्धा वाचवता येईल, असे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.