शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

मदत नसेल द्यायची तर नका देऊ, आशेवर जगवता कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : शासनाने कितीही कायदे, आयोग नेमू द्या, प्रशासनात बसलेल्या मंडळींची संवेदनाच मृत पावली आहे. आपली ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : शासनाने कितीही कायदे, आयोग नेमू द्या, प्रशासनात बसलेल्या मंडळींची संवेदनाच मृत पावली आहे. आपली सेवा आमचे कर्तव्य ही संकल्पना रुजवत महाराष्ट्र शासनाने २८ एप्रिल २०१५ रोजी राज्य लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करत कायदा अंमलात आणला. पात्र व्यक्तींना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा प्रदान करण्याचा हा कायदा आहे. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना कायद्याचा धाकच उरलेला नसल्याचे दिसून येते. महावितरणच्या चुकीमुळे एका ग्रामीण भागातील व्यक्तीचा मृत्यू होतो अन् महावितरणच्या या चुकीचे प्रायश्चित ते कुटुंबीय भोगताहेत. नऊ महिने लोटूनही त्या कुटुंबीयांना दमडीची मदत दिली गेली नाही.

साधे त्या कुटुंबाचे सांत्वन करण्याचे सौजन्य नाही. अरे नका देऊ मदत, पण एकदाचे हे कायद्यात बसत नाही असे सांगून मोकळे व्हा ना. कशाला त्या कुटुंबीयांना मदतीसाठी खर्डेघाशी करून कागद रंगवायला भाग पाडताय. बिचारे तुमच्या आशेवर दिवस काढत आहेत. मदत देण्याचं धोरण शासनाचं आहे, मग प्रशासनाला अडचण कसली यावरून "चहापेक्षा केटली गरम" असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर हे जंगलात वसलेले छोटेसे आदिवासी गाव. या गावात मेश्राम कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली, कुणास ठावूक. २२ जून २०२० रोजी निताराम ऋषी मेश्राम हा अर्धांगिनी चंद्रकला व मुलांसह शेतात गेला होता. निसर्गचक्र किंवा महावितरणच्या रूपात "यमराज" आपली वाट बघतोय अशी पुसटशीही कल्पना त्याला नव्हती. पाऊस येईल या लगबगीने तो सकुटुंब शेतातून परत येत होता. पुढे कारभारीन व मोठा मुलगा तर पाठीमागून लहान मुलासह तो गुरेढोरे घेऊन येत होता. वाटेत रस्त्याच्या कडेला विजेचा खांब होता. खांबाच्या तणावाला जिवंत वीजप्रवाह होता. तणावाजवळून जाताना त्याला हलकासा विजधक्का बसला. क्षणार्धात तो तणावाला चिकटला. काळाने त्याचेवर झडप घातली. त्या अभागिनीच कुंकुच पुसल्या गेलं. काय रस्त्याने जाणं त्याची चूक होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे हृदय द्रवत नाही ही खरी शोकांतिका आहे. प्रशासनाच्या मोठमोठ्या हुद्द्यावर जी मंडळी बसली आहे न, ती स्वतःला शेतकरी पुत्र आहे म्हणून अभिमानाने सांगतात. मात्र ज्यावेळी शेतकऱ्याला मदत देण्याचा विषय येतो ना तेव्हा यांच्या संवेदनाच मृत पावतात, पण असे का घडते. हा आरामदायी खुर्ची व वातानुकूलित संयंत्राचा परिणाम तर नाही ना? यावर संशोधनाची गरज आहे. विभागाच्या चुकीमुळे एखादी व्यक्ती मृत पावणे यांच्यासाठी अगदी सहज आहे, पण त्या मृताच्या कुटुंबीयांना काय वेदना, हालअपेष्टा होतात त्याची जाणीव त्यांना नाही. वीज खांबाच्या तणावाला जिवंत वीजप्रवाह कसा आला. याची चौकशी केली? का यात दोषी असणाऱ्यांवर काय कारवाई केली? याचे उत्तर अजूनही सापडत नाही.

.....

मदतीसाठी विधवेची फरफट सुरुच

मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून आर्थिक मदत दिली जाते असं कुणीतरी त्यांना सांगितलं. त्या विधवेनं कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्यासाठी खर्चही केला. अर्जुनीच्या महावितरण कार्यालयात जमा केले. आज मदत मिळेल, उद्या मिळेल या प्रतीक्षेत नऊ महिने लोटले. महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजविणे सुरूच आहे. आशाळभूत अपेक्षेने घराबाहेर पडायचे. महावितरणच्या कार्यालयात पोहचून विचारपूस करायची. मदत मिळेल हे नेहमीच उत्तर ऐकून कान बधिर झाले. हे ऐकून नैराश्याने परत यायचे. हा जणू त्यांचा दिनक्रमच झाला आहे.