शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखे आपलेही नावलौकिक व्हावे, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाचगाणे ऐकत ...

गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखे आपलेही नावलौकिक व्हावे, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाचगाणे ऐकत व त्याचे प्रात्याक्षिक करत मुंबईची रस्ता धरणाऱ्या अनेक मुला-मुलींना रेल्वेस्थानकावर पकडण्यात आले. जिल्हा पोलिसांनीही अनेकदा ऑपरेशन मुस्कानच्या मोहिमेत घरातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना रेल्वेस्थानक व बसस्थानकावरून पकडून पालकांच्या स्वाधीन केले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मुलामुलींनी मुंबईला हिरो बनण्यासाठी आपले घर सोडून मुंबईदेखील गाठली आहे. काही मुले-मुली बेपत्ता होता तर काही मुले-मुली स्वत:हून घर सोडून देतात. गोंदिया जिल्ह्यातून हरविलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुला-मुलींना ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पकडून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

.......................

कोणाला बंगला, गाडीचे आकर्षण, तर कोणाला घरातील वादाचा कंटाळा

- बहुतांश मुला-मुलींना आपला बंगला असावा, गाडी असावी असे आकर्षण असल्याने ते याचा ध्यास ठेवून घराबाहेर पडतात.

- घराबाहेर पडल्याशिवाय आपला विकास होणार नाही, जग कसे आहे हे घराबाहेर पडल्यानंतरच कळेल असे समजून मुले-मुली बाोर पडतात.

- घरात आईवडिलांचा सतत होणारा वाद, त्यांची कटकट यामुळे घर सोडून अनेक मुले घरातून बाहेर पडतात.

...............

म्हणून घर सोडले....

आपल्याला अभिनेत्री व्हायचे आहे. आईवडिलांच्या संमतीने आपण घराबाहेर पडले. मुंबईत नाटक, चित्रपटात काम करून आपलेही नाव समाजात मोठे करील या आशेने मुंबईला गेली. काही वर्षे काम केले, परंतु तिथे कुणाची मदत होत नसल्याने मी परत आली, असे एका मुलीने म्हटले आहे.

.............

मला सिनेमात काम करायचे आहे म्हणून गोंदिया सोडून मुंबई गाठली.

अनेक सिनेमात व सीरियलमध्ये काम करून आपले नाव मोठे करण्याचे स्वप्न रंगवित आहे. कामाला जोमाने सुरुवातही झाली. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आमच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. आता गाडी पुन्हा हळूहळू सुरू झाली आहे, असे एका गोंदियातील तरुणाने सांगितले.

.............

मिळालेली बालके चाईल्ड लाइनच्या स्वाधीन

रेल्वेस्थानकावर दरराेज बंदोबस्त लावला जातो. या बंदोबस्तादरम्यान रेल्वेस्थानकावर एकटा मुलगा किंवा मुलगी असेल तर आमच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून विचारपूस केली जाते. आम्हाला वाटले की मुलगा-मुलगी घर सोडून आलेत तर त्यांना चाईल्ड लाइनसोबत संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन करण्यात येते.

- नंद बहादूर, रेल्वे सुरक्षा बल अधिकारी गोंदिया.

.....