शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

पाच महिन्यांत ७५ टक्के अभ्याक्रम कसा पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:26 IST

गोंदिया : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. २६ जून रोजी उघडणाऱ्या शाळा पाच महिन्यांनंतर म्हणजे २३ नोव्हेंबरला सुरू ...

गोंदिया : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. २६ जून रोजी उघडणाऱ्या शाळा पाच महिन्यांनंतर म्हणजे २३ नोव्हेंबरला सुरू करण्यात आल्या. शासनाने कोरोनाच्या संकटाला पाहून २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, परंतु शाळा सुरू झाल्यापासून परीक्षेचा वेळ येईपर्यंत पाच महिन्यांचाच कालावधी मिळत आहे. त्यातही एक दिवसाचा खंड देऊन विद्यार्थांना शिकविले जात आहे. त्यामुळे दहावी किंवा बारावीचा असलेल्या अभ्याक्रमापैकी ७५ टक्के अभ्याक्रम या काळात पूर्ण होणार नाही. त्यामुळे फक्त ५० टक्केच अभ्यासक्रम शासनाने ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शाळांत फक्त ३७ टक्केच विद्यार्थी आतापर्यंत पाेहोचले आहेत. त्या ३७ टक्के विद्यार्थ्यांपैकी अर्ध्या विद्यार्थांना शिकविले जाते, तर उर्वरित अर्ध्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी तोच अभ्यासक्रम शिकविला जातो. आता जानेवारी महिना अर्धा लोटला असून, विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजणेही आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला असला, तरी आणखी २५ टक्के म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रमातून ५० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची गरज आहे.

बॉक्स

दहावीचा अभ्यासक्रम ७५ टक्के

दहाव्या वर्गाचा अभ्यासक्रम असलेल्या पुस्तकातील २५ टक्के अभ्यासक्रम कमी केल्याची माहिती शिक्षण विभागाला देण्यात आली. त्या ७५ टक्के अभ्याक्रमावर मुलांना शिकविण्याचे काम केले जात आहे, परंतु हे अभ्याक्रम वेळेच्या आत पूर्ण करण्यात येणार नाही.

बॉक्स

बारावीच्या अभ्यासक्रमाला वेळ अपुरा

बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. मार्चऐवजी मे महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत असल्याने, दोन महन्याची उसंत मिळाली, परंतु एवढ्या कमी वेळेत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे.

कोट

विद्यार्थ्यांना एक दिवस आड शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यात गती नाही. परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या, परंतु पाच महिन्यांनंतर सुरू झालेले अभ्यासक्रम एक दिवस आड विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्याने, अभ्यासक्रम कमी करण्याची गरज आहे.

अनिल मुरकुटे

मुख्याध्यापक विद्या निकेतन आमगाव.

कोट

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे झालेले नुकसान आता भरून निघेल. शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम हे एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. कोरोनाची लाट आता आली नाही, तर निश्चितच अभ्यासक्रम पूर्ण होईल.

व्ही.डी. मेश्राम,

प्राचार्य, पंचशिल हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय मक्काटोला.

कोट

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्यावर चारच तास शाळा भरली. यात वर्गातील अर्धे विद्यार्थी एका दिवशी तर अर्धे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत आले. शिक्षकांनी एक दिवस आड दिलेल्या शिक्षणामुळे आमचा अभ्यास मागील काळापेक्षा संथ गतीने चालत असल्याचे वाटते.

- स्मिता रविशंकर हुकरे, वर्ग १०वा आदर्श विद्यालय आमगाव

कोट

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाच महिने उशिरा शाळा सुरू झाल्यात, त्यातच एक दिवसाचा खंड घेऊन आम्हाला शिक्षण मिळाले. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला, परंतु ७५ टक्के अभ्यासक्रमाला अर्धा वेळ त्यातही एक दिवस आड पुढची माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांवर बोझा पडत आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करावा.

संदीप बारसे, वर्ग १२वी पंचशिल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला