शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

कशी मिळणार लसीकरणाला गती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

गोंदिया : कोरोनाला पायबंद घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकडे पाहिले जात आहे. त्याच दृष्टिकोनातून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य विभाग आणि ...

गोंदिया : कोरोनाला पायबंद घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकडे पाहिले जात आहे. त्याच दृष्टिकोनातून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन व्यापक स्तरावर उपाययोजना करीत आहे; मात्र लसीकरणासाठी पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून याला वारंवार ब्रेक लागत आहे.

गोंदिया जिल्ह्यात एकूण १४० केंद्रांवरुन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम सुरु आहे. एकाच दिवशी जवळपास ७ हजारांवर नागरिकांना लसीकरण केले जात होते; मात्र आता लसीकरणाची गती मंदावली आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याला १० हजार कोविशिल्ड आणि ३४०० कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले होते. या डोसचा सर्व लसीकरण केंद्रांना पुरवठा करण्यात आला. हे डोस देखील आता संपुष्टात आले असून सोमवारी केवळ चार-पाच केंद्र मिळून ७०० डोस शिल्लक होते. तर काही केंद्रांवर डोस उपलब्ध नसल्याने मोजक्याच केंद्रावरुन लसीकरण सुरु होते. मंगळवारी डोस प्राप्त न झाल्यास लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण ठप्प पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६६ हजारांवर नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. तर जनजागृतीमुळे आता नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेत आहेत; मात्र शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने मोहिमेला वारंवार ब्रेक लागत असल्याने नागरिकांमध्ये सुध्दा उदासीनतेचे वातावरण आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य विभाग व्यापक स्तरावर जनजागृती करीत आहे; मात्र शासनाकडे लसींचा पुरवठा होत नसल्याने मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. त्यामुळे शासनाने लसींचा पुरवठा वाढविण्याची गरज आहे.

...........

ते पाच हजार डोस केवळ १८ वर्षांवरील नागरिकांसाठी

जिल्ह्यात १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना एकूण पाच केंद्रांवरुन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यासाठी राज्य शासनाने ५ हजार डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच या डोसचा वापर केवळ १८ वर्षांवरील नागरिकांसाठीच करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यामुळे डोस त्यासाठीच वापरले जात आहे.

.........

केंद्रांना उद्दिष्ट ठरवून दिल्यानंतरही हिरमोड

शनिवारपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवरुन १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी एका केंद्राला दररोज १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे व त्याचा संदेश गेला आहे त्यांनाच लस देण्याची सूचना आहे. मात्र शेड्युलमध्ये असलेल्या नागरिकांना लस मिळत नसल्याने त्यांना लसीकरण केंद्रावरुन लस न घेताच परत यावे लागत आहे.