शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

३ दिवसात कसे गाठणार परीक्षेचे स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST

गोंदिया : बहुजन कल्याण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत एमपीएससी-युपीएससी विद्यार्थ्यांना ...

गोंदिया : बहुजन कल्याण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत एमपीएससी-युपीएससी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यासाठीच्या इच्छुक उमेदवारांची राज्यस्तरीय छाननी परीक्षा सोमवारी (दि.१३) राज्यातील विविध केंद्रांवर होणार असल्याचे गुरुवारी (दि.९) जाहीर केले. मात्र, तीन ३ दिवसांत विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे व मुंबईसारख्या ठिकाणाहून येऊन परीक्षा द्यायची आहे.

महाज्योतीकडून निर्धारित गटातील इच्छुक उमेदवारांना युपीएससी व नागरी गटातील परीक्षासांठी प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महाज्योतीने चाचणी परीक्षा घेण्याचे ठरवून सोमवारची (दि.१३) तारीख जाहीर करुन विद्यार्थ्यांच्या अचडणीत अजून वाढ केली आहे. गुरुवारपासून (दि.९) महाज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मानसिक संताप होऊ लागला आहे. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी कमीत कमी १ महिन्यांचा कालावधी द्यावा लागतो. त्यातच युपीएससी चाचणी परीक्षेविषयी १६ आँगस्ट रोजी महाज्योतीच्या संचालकाच्या बैठकीत चर्चा होऊन २८ आँगस्ट रोजी परिक्षा घेण्याचे नियोजित होते. तरीही परीक्षा घेण्यात आली नाही.

या प्रशिक्षणात फक्त ऑनलाइन वर्ग आहेत कुठलेही विद्यावेतन मिळणार नाही. २०२२ साठी नवीन बँच सुरू करणे योग्य नाही. कारण २०२२ ची पूर्व परीक्षा ५ जून २०२२ घोषित झाली आहे. त्यासाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी खाजगी प्रशिक्षण व अथवा त्यापद्धतीने अभ्यास सुरू केला आहे. त्याऐवजी २०२३ साठी नवीन बँच व २०२१ व २०२२ साठी मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देणेच योग्य ठरेल.

-------------------------------

विद्यार्थ्यांची अडचण वाढली

आता अचानक तारखेची घोषणा करण्यात आली व त्यातही जवळपास महाराष्ट्रातील दोन हजार विद्यार्थी अभ्यासासाठी दिल्लीत वास्तव्यास आहेत आणि त्यांची नागरी सेवा पूर्व परीक्षा फक्त महिन्याभरावर आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना तातडीने येऊन परीक्षा देणे कितपत योग्य आहे. यात त्यांचे ३-४ दिवसांंच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही का ? असा प्रश्न्ही उपस्थित केला जात आहे. युपीएससी नागरी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये असल्याने ही परीक्षा १० ऑक्टोबरनंतरच घ्यायला पाहिजे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.