शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

३ दिवसात कसे गाठणार परीक्षेचे स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST

गोंदिया : बहुजन कल्याण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत एमपीएससी-युपीएससी विद्यार्थ्यांना ...

गोंदिया : बहुजन कल्याण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत एमपीएससी-युपीएससी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यासाठीच्या इच्छुक उमेदवारांची राज्यस्तरीय छाननी परीक्षा सोमवारी (दि.१३) राज्यातील विविध केंद्रांवर होणार असल्याचे गुरुवारी (दि.९) जाहीर केले. मात्र, तीन ३ दिवसांत विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे व मुंबईसारख्या ठिकाणाहून येऊन परीक्षा द्यायची आहे.

महाज्योतीकडून निर्धारित गटातील इच्छुक उमेदवारांना युपीएससी व नागरी गटातील परीक्षासांठी प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महाज्योतीने चाचणी परीक्षा घेण्याचे ठरवून सोमवारची (दि.१३) तारीख जाहीर करुन विद्यार्थ्यांच्या अचडणीत अजून वाढ केली आहे. गुरुवारपासून (दि.९) महाज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मानसिक संताप होऊ लागला आहे. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी कमीत कमी १ महिन्यांचा कालावधी द्यावा लागतो. त्यातच युपीएससी चाचणी परीक्षेविषयी १६ आँगस्ट रोजी महाज्योतीच्या संचालकाच्या बैठकीत चर्चा होऊन २८ आँगस्ट रोजी परिक्षा घेण्याचे नियोजित होते. तरीही परीक्षा घेण्यात आली नाही.

या प्रशिक्षणात फक्त ऑनलाइन वर्ग आहेत कुठलेही विद्यावेतन मिळणार नाही. २०२२ साठी नवीन बँच सुरू करणे योग्य नाही. कारण २०२२ ची पूर्व परीक्षा ५ जून २०२२ घोषित झाली आहे. त्यासाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी खाजगी प्रशिक्षण व अथवा त्यापद्धतीने अभ्यास सुरू केला आहे. त्याऐवजी २०२३ साठी नवीन बँच व २०२१ व २०२२ साठी मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देणेच योग्य ठरेल.

-------------------------------

विद्यार्थ्यांची अडचण वाढली

आता अचानक तारखेची घोषणा करण्यात आली व त्यातही जवळपास महाराष्ट्रातील दोन हजार विद्यार्थी अभ्यासासाठी दिल्लीत वास्तव्यास आहेत आणि त्यांची नागरी सेवा पूर्व परीक्षा फक्त महिन्याभरावर आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना तातडीने येऊन परीक्षा देणे कितपत योग्य आहे. यात त्यांचे ३-४ दिवसांंच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही का ? असा प्रश्न्ही उपस्थित केला जात आहे. युपीएससी नागरी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये असल्याने ही परीक्षा १० ऑक्टोबरनंतरच घ्यायला पाहिजे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.