शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावातील पथदिवे अजून किती दिवस राहणार बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST

केशोरी : सार्वजनिक पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह केशोरी येथील ...

केशोरी : सार्वजनिक पथदिव्यांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह केशोरी येथील सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा विद्युत वितरण कंपनीने बंद केला आहे. तेव्हापासून येथील नागरिकांना रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस आणि सणासुदीच्या काळात तरी गावातील सार्वजनिक विद्युत पथदिवे प्रकाशमान होतील का? अजून किती दिवस अंधारात राहावे लागणार, असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह केशोरी येथील सार्वजनिक पथदिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण असते. परंतु गावातील सार्वजनिक पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल १५व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून भरण्यात यावे, असे शासनाने आदेश दिले आहेत. परंतु त्यामधून गावातील इतर सोयी-सुविधा पूर्ण करण्याचे नियोजन करून ग्रामपंचायतीने निधी खर्ची घालून सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरणे शक्य नसल्याचे सरपंच तालुका संघटनेने निवेदनातून म्हटले आहे. त्यामुळे अद्यापही सार्वजनिक पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही. संपूर्ण गावे अंधारात सापडली आहेत. अजून पथदिव्यांचा अंधार किती दिवस राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

.............

गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सणासुदीचे दिवस आल्यामुळे गावातील सार्वजनिक पथदिव्यांचा वीजपुरवठा नियमित करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. याकरिता संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने आणि विद्युत वितरण कंपनीने त्वरित तडजोड करून पथदिव्यांच्या विद्युत पुरवठा सुरू करावा. जेणेकरून नागरिकांच्या संघर्षाला तोंड देण्याची वेळ येणार नाही.