शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अतिवृष्टीने राजगुडा, मंदीटोला येथील घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST

सडक अर्जुनी : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी मुसळधार पाऊस ...

सडक अर्जुनी : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने राजगुडा, मंदीटोला, माेगरा येथील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, तर काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साल्याने त्यांची गैरसोय झाली.

हवामान विभागाने जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यातच मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नदी, नाले भरून वाहात असून, संकटातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील राजगुडा, मंदीटोला, मोगरा येथील घरांची पडझड झाली. तर काही नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचले आहे. राजगुडा येथील भोजराज इडपाते यांच्या घरात पाणी साचले तसेच घराची भिंत कोसळल्याने त्यांचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर नागेश वैद्य यांच्या वाडीतील तूर पीक वाहून गेले. अजित मेश्राम यांच्या घरात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तलाठी राजू उपरीकर यांनी केले. नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच मोहन सुरुसाऊत, उपसरपंच भय्यालाल मडावी, नीलकंठ परतेकी, मंगेश पंचभाई, नागेश वैद्य, किस्मत पंचभाई, आतील वैद्य यांनी केली आहे.