शहरं
Join us  
Trending Stories
1
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
2
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
3
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
4
...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
5
परदेशी विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड विद्यापीठाचे दरवाजे बंद! ७८८ भारतीय विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार?
6
बँकांनी व्याजदर कापले? नो टेन्शन! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला FD पेक्षाही जास्त परतावा देईल
7
भीषण अपघात, भरधाव कार रस्त्यावरून घसरून झाडावर धडकली, तीन मित्रांचा जागीच मृत्यू 
8
Video: स्मृती मंधानाने दणक्यात साजरा केला बॉयफ्रेंडचा वाढदिवस; बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी
9
आर्यन खान तुरुंगात कसा राहायचा? राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग'मध्ये शाहरुखच्या लेकाचाही उल्लेख
10
वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी; हगवणेंच्या मोठ्या सुनेची मागणी
11
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....
12
बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली
13
धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?
14
आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."
15
"कुणी मंत्री असो वा श्रीमंताने माजलेलं घराणं...", वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतप्त
16
टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरचा मैत्रिणीने केला विश्वासघात! २५ लाखांची फसवणूक, दागिनेही गायब
17
अ‍ॅपलने नथिंगचा मुख्य डिझायनर पळवला; कार्ल पेई यांनी टिम कूकनाच टॅग केले, म्हणाले...
18
Test Retirement: विराट-रोहितनंतर आता 'या' दिग्गजावरही लवकरच येणार कसोटी निवृत्तीची वेळ
19
कोणत्या मिसाईलची टेस्टिंग? अंदमान समुद्राचे आकाश विमानांसाठी बंद; एका दिवसासाठी NOTAM जारी
20
ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक

होम क्वारंटाईन रुग्णांनी गावात फिरणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी या गावातील कोरोनाचा झालेला विस्फोट लक्षात घेवून तालुका प्रशासनाने आवागमन करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी या गावातील कोरोनाचा झालेला विस्फोट लक्षात घेवून तालुका प्रशासनाने आवागमन करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन संचारबंदी लागू केली आहे. तरीही दररोज वाढणारी कोरोना रुग्ण संख्या थांबत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांवर उपचार करता-करता आरोग्य विभाग हतबल झाले आहे. कोरोना रुग्ण वाढीला कारणीभूत असणारे होम क्वारंटाईन व्यक्ती कुणालाही न जुमानता दिवसातून पाच ते सहा वेळा घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे बोलल्या जात आहे.

वास्तविक होम क्वारंटाईन कोरोना बाधित रुग्णांनी १४ ते १७ दिवसापर्यंत सामान्य लोकांच्या संपर्कात येवू नये असे असतानाही होम क्वारंटाईन रुग्ण गावात फिरत असल्यामुळे अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना बाधीत रुग्ण साधारणत: १४ ते १७ दिवसापर्यंत सामान्य निरोगी व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतो.या बाबीकडे कोरोना बाधीत रुग्ण दुर्लक्ष करुन मला काहीच लक्षणे दिसत नाही. मला काहीच त्रास नाही, मी बरा आहे, नार्मल झालो आहे. असे सांगून पाच ते सहा वेळा दिवसातून घराबाहेर पडून कोरोनाचा संसर्ग वाढवित आहे. अशा व्यक्तींनी घरी राहूनच प्रशासनाला, आरोग्य विभागाला मदत केली पाहिजे. परिणामी कोरोनाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. कोरोना महामारीला कोणीही हलक्यात घेवू नये.

.......

सुजान नागरिक म्हणून सहकार्य करा

प्रशासन व आरोग्य विभाग त्यांच्या परीने पूर्ण ताकदीने रात्रदिवस काम करीत आहेत आपण उघड्या डोळ्यानी परिस्थिती पाहात आहोत. तरीही विनाकारण फिरण्याकडे अधिक लक्ष कृपया असे न करता होम क्वारंटाईन कोरोना बाधीत रुग्णांनी घरात राहून आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सुजाण नागरिक म्हणून प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे दिवसेंदिवस कोरोनाचा वाढणारा संसर्ग थांबविण्यासाठी मदत करणे आवश्यक झाले आहे. कोरोना बाधीत रुग्ण गावात विनाकारण फिरुन समाजासाठी आणि आपल्या कुटूंबासाठी देखील घातक ठरु पाहात आहेत. होम क्वारंटाईन व्यक्तीने सामाजिक जबाबदारी समजून बाहेर फिरणे टाळावे आपला होम क्वारंटाईन कालावधी घरात राहून पूर्ण करावा असे आवाहन गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यानी केले आहे.