शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

बाजार लिलावात सर्वाधिक रक्कम

By admin | Updated: March 24, 2017 01:35 IST

सन २०१७-१८ या वर्षाकरीता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.

सुविधांचा मात्र अभाव : नगरपंचायतला मिळणार १० लक्ष ७० हजारांचे उत्पन्नदेवरी : सन २०१७-१८ या वर्षाकरीता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. ही रक्कम यापूर्वी मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा पाच पटींनी जास्त आहे. याकरीता लिलाव प्रक्रिया गुरूवारी (दि.२३) नगरपंचायतमध्ये पार पडली. सर्वाधिक बोली बोलून आठवडी बाजार मिळविण्यात माजी सरपंच जैपाल शहारे यांनी हा लिलाव जिंकला. त्यामुळे आता आठवडी बाजाराची वसुली शहारे करतील. मागील ठेकेदारापासून दुकानदाराना होणारा त्रास बघता भाजी व्यवसायिक असलेले जैपाल शहारे यांनी बाजार मिळविला. याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. मागील १५ दिवसापूर्वी न.पं.चे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी आठवडी बाजाराची पाहणी केली व दुकानदारांना सर्व बाबीची विचारपूस केली. त्यावेळी ठेकेदाराकडून जास्त रुपयांची वसुली व्यावसायीकांकडून होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे न.प.द्वारे नवीन शर्ती व अटी लावून आगामी वर्षाच्या बाजाराचा लिलाव करण्यात आला. नगराच्या बाजारात अनेक समस्या आहेत. काही ठिकाणी ओटे बनविण्यात आले परंतु या ओट्यावर शेड नसल्याने दुकानदारांना ऊन व पावसाचा त्रास सहन करावा लागतो. दुकानदारांनी बऱ्याचदा सुविधा पुरविण्याबाबत अगोदर ग्रा.पं. व आताच्या नगरपंचायतला कळविले. परंतु त्यांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने आतातरी मुख्याधिकारी याकडे लक्ष देवून दुकानदारांना सुविधा प्रदान करणारा काय? असा सवाल केला जात आहे. तालुक्याचा सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून देवरी बाजाराची ओळख आहे. राजनांदगाव (छ.ग.) गोंदिया, आमगाव, साकोली, भंडाराचे व्यापारी येत असतात. अतिक्रमणामुळे जागा जरी कमी शिल्लक असला तरी शेकडो लहान मोठी दुकाने लागत असतात. परंतु सुविधा मिळत नसल्याने व बाजारात ठेकेदाराला जास्त पैसे द्यावे लागत असल्याने व्यापारी नाराज आहे.आतातरी सुविधा द्या!यावर्षी नगरपंचायतला १० लक्ष रुपयांच्यावर उत्पन्न मिळत असले तरी या आठवडी बाजारात मुलभूत सुविधा आतातरी मिळणार काय? असा संतप्त प्रश्न केला जात आहे. पिण्याचे पाणी, शौचालय, रस्ते व वीज या प्रमुख सुविधा मिळत नसल्याने व्यापाऱ्यामध्ये नगर पंचायतविरूध्द असंतोष बघायला मिळतो. शौचालय व पिण्याच्या पाण्याची टाकी काही वर्षापूर्वी आठवडी बाजारात बांधण्यात आली. परंतु त्याला आतापर्यंत कुलूपच लावून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारी सोडून व्यापाऱ्यांना इतरत्र दूर अंतरावर भटकावे लागते. याचा सर्वाधिक त्रास स्त्रीवर्गाला होत असतो.