शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

एकस्तर अतिरिक्त वेतन प्रदान वसुलीला उच्च न्यायालयाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात मोडणाऱ्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडील शेवटचा जिल्हा आहे. ६ ऑगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार ...

गोंदिया : जिल्हा नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात मोडणाऱ्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडील शेवटचा जिल्हा आहे. ६ ऑगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येतो. परंतु १२ वर्षाच्या आश्वासित प्रगती योजनेनंतर एकस्तर वेतनश्रेणी बंद करण्यात आली. त्यामुळे वेतनात खूप तफावत निर्माण होते. यामुळे नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षकांवर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने वारंवार निवेदन देऊन आपली मागणी मांडण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अन्याय दूर न झाल्यामुळे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेतली. परिणामी येथील जिल्हा परिषदेतील नक्षल आणि आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीमध्ये अतिप्रदान झालेल्या रकमेच्या वसुलीला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, सरचिटणीस अनिरुद्ध मेश्राम यांच्या मार्गदर्शनात किशोर बावनकर, वाय. एस.मुंगूलमारे, सोमेश्वर मेश्राम, सुभाष सिंदीमेश्राम यांनी प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन सर्वांना समजावून या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. त्यानुसार मार्च २०२० ला उच्च न्यायालयात प्रदीप क्षिरसागर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची बाजू मांडण्यासाठी याचिका दाखल केली. नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना १२ वर्षे पूर्ण झाल्याचे कारण दाखवत उशिरा चटोपाध्याय वेतनश्रेणी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करीत या कालावधीत एकस्तर वेतनश्रेणी नुसार वेतन प्रदान केले. हे वेतन अतिरिक्त ठरवून त्यांची वसुलीची नोंद सेवापुस्तकात घेऊन वसुलीची कार्यवाही सुरू केली. पंचायत समितीच्या लिपीकांनी फोन करून कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी दबाव आणला.

हा प्रकार सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत जास्त झाल्याचे निदर्शनास आले. चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ न देता एकस्तर वेतनश्रेणी सुरूच ठेवावी आणि अतिरिक्त वेतन वसुली रद्द करावी यासाठी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठासमोर मांडण्यासाठी प्रदीप क्षीरसागर यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर १० फेब्रुवारी २०२१ रोजी न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठात सुनावणी करीत अतिरिक्त वेतन वसुलीच्या स्थगितीचे आदेश दिले. १० मार्च पर्यंत यावर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रभाकर मेश्राम, विजय डोये, केदार गोटेफोडे, नागसेन भालेराव, वाय. डी. पटले, मोरेश्वर बडवाईक, हेमंत पटले, विनोद लिचडे, नरेंद्र आगाशे, शंकर नागपुरे, सुरेश रहांगडाले, मयूर राठोड, रमेश संग्रामे, अरविंद नाकाडे, शंकर चव्हाण, आनंद गौपाले, गभने, चेतन उईके, विनोद चौधरी, खराबे, एम.आर. पारधी, सुरेश मेश्राम, ए.डी. पठाण यांंनी केले आहे.