शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

शेतकऱ्यांना मिळणार मदत

By admin | Updated: March 8, 2015 01:15 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नोंद कृषी विभागाने योग्य पद्धतीने घ्यावी. नुकसान कमी असो वा जास्त असो,

गोंदिया : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नोंद कृषी विभागाने योग्य पद्धतीने घ्यावी. नुकसान कमी असो वा जास्त असो, फळपिकांचे असो अथवा भाजीपाला पिकाचे असो, झालेल्या नुकसानाची नोंद घेऊन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एन.के. लोणकर, सहायक आदिवासी आयुक्त सुरेश पेंदाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी उपस्थित होते.बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी सडक अर्जुनी येथे अंदाजे १०० हेक्टरवरील झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तिरोडा व अर्जुनी मोरगावला पावसाचे जास्त प्रमाण असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी प्रामुख्याने घ्यावी असे सांगितले. या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १०० मि.मी. पाऊस पडला असून सर्व तालुक्यातील जवस, गहू, लाखोरी, ऊस, ज्वारी या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र व त्या प्रमाणात झालेल्या नुकसानाचे प्रमाण याबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सैनी यांनी आपली सादरीकरणाद्वारे प्रत्येक तालुक्यातील पीक लागवडीखालील क्षेत्र, पावसाचे प्रमाण, जीवित व वित्तहानी याबाबत माहिती दिली. सालेकसा तालुक्यातील पाहणी व नुकसानग्रस्त भागाची नोंद त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)